Mumabi Traffic: अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा; पाच दिवसांसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

Ananta-Radhika Royal wedding ceremony: अनंत राधिका अंबानी यांच्या शाही सोहळा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हा सोहळा पाच दिवस चालणार आहे. सोहळ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केलेत.
Mumabi Traffic: अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा; पाच दिवसांसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Mumabi TrafficSaam Tv

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही लग्न सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स पार पडणार आहे. हा सोहळा साधारण पाच दिवस असणार आहे, या सोहळ्यात व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे ट्रॉफिकची समस्या निर्माण होऊन नये, मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथं जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणाऱ्या लग्न सोहळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुंबई पोलिसांकडून या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आलंय.

अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह सोहळा येत्या १२जुलै रोजी होणार आहे. यावेळी देशभरातील नामवंत व्यक्ती, उद्योजक, सेलिब्रिटी या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील बीकेसी परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आलेत. वाहतुकीतील बदलाबाबत मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढलंय. काढलेल्या पत्रकानुसार ५ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून मध्य रात्रीपर्यंत तसेच १२ ते १५ जुलै या काळात दुपारी १ वाजल्यासपासून मध्यरात्रीपर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com