मनोज जरांगे पाटील यांच्या ७ महिन्याच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. रात्रीतूनच याबाबतचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. मागण्या मान्य होताच नवी मुंबईत मराठा समाजाने जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आमच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मी राज्य सरकारचे आभार मानतो, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे. "आमची विजयी सभा अंतरवाली सराटी येथील सभेपेक्षाही प्रचंड मोठी असेल. या सभेत आमचा सर्व मराठा समाज एकत्र जमणार आहे".
"आम्हाला फक्त ठिकाण बघायचं आहे. आम्ही शनिवारी (२७ जानेवारी) वाशी येथील शिवाजी चौकात जल्लोष करणार आणि त्यानंतर विजयी सभेची तारीख जाहीर करणार आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते.
त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली होती. सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शुक्रवारी (२६ जानेवारी) मराठ्यांचं वादळ नवी मुंबईत येऊन धडकलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.