Shinde-Fadnavis-Pawar Govt PC : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पावसाची चिंता आम्हालाही आहे; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही

Political News : विरोधीपक्ष कितीही कमकूवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
Ajit pawar devendra fadnavis eknath shinde
Ajit pawar devendra fadnavis eknath shindeSaam Tv

Mumbai News : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सरकारच्या चहापाणाला विरोधक नेहमीप्रमाणे आले नाहीत.

राज्यात पाऊस चांगला झालेला नाही. पावसाची चिंता आम्हालाही आहे. शेवटी निसर्ग आहे लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीठ होत आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

विरोधकांना दुय्यम स्थान देणार नाही- मुख्यमंत्री

दररोज सकाळी आपण दाखवता सरकार पडेल, मात्र ते काही पडलं नाही. आता आणखी मजबूत झालं आहे. सरकार म्हणून आता आमची जबाबदारी आहे, विरोधीपक्ष कितीही कमकूवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Ajit pawar devendra fadnavis eknath shinde
Jitendra Awhad Letter To Rahul Narvekar: मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांना आमच्यासोबत बसवू नये; जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

लोाकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न- फडणवीस

अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा आम्ही करु. लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. इलेक्शन कमिशनने देखील निकाल दिला आहे. तरीही हे सरकार बेकायदेशीर असल्याची विरोकांकडून होत आहे. विरोधक एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारतात आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचं नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Political News)

Ajit pawar devendra fadnavis eknath shinde
Ahmednagar Crime News : गुंडागर्दीवर पोलिसांचा धाकच उरला नाही, राष्ट्र्वादीच्या आमदाराची गृहखात्यावर टीका

विरोधकांना योग्य उत्तर देऊ- अजित पवार

अजित पवार यांनी म्हटलं की, सभागृहात सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे, आयुधांचा वापर करुन योग्य पद्धतीने काम करणार. लोकशाही आम्हाला माहीत आहे. सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाच म्हणावं तसं प्रमाण नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा समाधानी राहील. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याच काम करु. उत्तरात थातूर मातूर सांगण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com