Nana Patole On Modi Government: '9 वर्षांत भाजपने देशाला लुटलं', नाना पटोलेंचा मोदी सरकारवर निशाणा

Modi Government 9 Years: 'भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे.' अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.
Nana Patole
Nana Patole Saam Tv

Mumbai News: देशातील मोदी सरकारला (Modi Government) नुकताच 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांत देशाला लुटलं', अशी टीका त्यांनी केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

Nana Patole
Sakshi Malik On Wrestler Protest: जंतर-मंतरवरुन हटलवल्यानंतरही कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच राहणार, साक्षी मलिक ट्वीट करत सांगितली पुढची भूमिका

नाना पटोले यांनी सांगितले की, 'मोदी सरकारने जीएसटीसारखा (GST) सुलतानी कायदा आणला. प्रत्येक गोष्टींवर जीएसटी आहे. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वसामान्यांवर टॅक्सचा बोझा आहे. आम्हीच देशाचा विकास केला असा आव देशाचे पंतप्रधान आणत आहेत.' तसंच, 'त्यांनी देशातील खरी परिस्थिती आणि वस्तूस्थिती मांडली पाहिजे. त्यांनीच २ हजारांच्या नोटा आणायच्या आणि त्यांनीच बंद करायचे. त्यावेळी त्यांना समजले नव्हते का आताच त्यांना समजले का?', असा सवाल नाना पटोले यांनी केला.

'महागाई आणि बेरोजगारीमुळे जनतेचे जीवन उद्धवस्त झाले आहे. या 9 वर्षातील परिस्थिती भाजपने माडंली असती तर खऱ्या अर्थाने पंतप्रधानांना विश्वगुरु पदवी देता आली असती.', अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसंच, 'महविकास आघाडीतील आलबेल नाही. तर शिंदे गटात आणि भाजप यांच्यातही अलबेलासारखी परिस्थिती आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे. संविधान वाचवणे हे आमचं ध्येय आहे. आधी देश आणि नंतर सत्ता. आम्ही संघटितच निवडणुकीला पुढे जाऊ.'

Nana Patole
NAMO Shetkari Yojna: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! नमो शेतकरी योजनेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

सकाळने केलेल्या सर्वेक्षणावर बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, 'सकाळच्या सर्वेक्षणात देखील राज्यात महाविकास आघाडीला 43 टक्के लोकांचा कौल मिळाला आहे. काँग्रेस हा त्यामधील मोठा भाऊ आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत नाही तर आम्ही समन्वयक आहोत. आम्ही मोठे आहोत असा कधी आव आणला नाही. मोठेपणाचा गर्व करण्याचे कारण नाही. सध्या देश महत्वाचा आहे देशाचे संविधान महत्वाचे आहे. भाऊ असलो तरी मोठेपणा करण्याची आम्हाला गरज नाही.' असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com