Maratha Reservation : मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण; बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

Maratha Reservation update : मनोज जरांगे यांचं मुंबईत पाचव्या दिवशी उपोषण कायम आहे. दुसरीकडे बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात झालीये.
Maratha Reservation update
Maratha Reservation Saam tv
Published On
Summary

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

५ लाख रुपयांखाली नुकसान झालेल्या प्रकरणांवर गुन्हे मागे घेतले

संपूर्ण महाराष्ट्रात ४०० प्रकरणांची तपासणी होणार

अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना ८ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : मुंबईत मनोज जरांगे यांनी उपोषण कायम ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा आंदोलन शांत करण्यासाठी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आंदोलन तापलं असताना बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. ज्या आंदोलनात पाच लाखांपेक्षा कमी नुकसान झालं आहे. त्या गुन्ह्याची प्रकरणे मागे घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Maratha Reservation update
Manoj Jarange Patil : सर्व पोरांना निरोप द्या, पाटलांना...; जरांगेंचं आंदोलकांना मोठं आवाहन, वाचा

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ज्या आंदोलनामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालंय. त्या गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांबाबत आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.

गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात मराठा आरक्षणा संदर्भात दाखल झालेली सुमारे 400 प्रकरण अद्याप तपासायची बाकी आहेत. ही सर्व प्रकरणे पुढील २० दिवसांत तपासून तातडीने अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे महत्वाचे निर्देश दिले आहेत.

Maratha Reservation update
Maratha Reservation : मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण; बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

सर्व प्रलंबित प्रकरणांची तपासणी आठ दिवसात पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश याबाबत आहेत. या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com