Rs 2000 Note Withdrawn: दोन हजाराची नोट चलनातून बाद, आरबीआयने असा निर्णय का घेतला? बँकिंग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Rs 2000 Note Withdrawn: २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या प्रक्रियेवर बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी भाष्य केलं आहे.
Rs 2000 Notes/file
Rs 2000 Notes/fileSAAM TV

Rs 2,000 notes withdrawn: भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या निर्णयाने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरबीआयने या २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्यास सांगितल्या आहेत. याच २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या प्रक्रियेवर बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

२००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या प्रक्रियेवर विद्याधर अनास्कर म्हणाले, 'आरबीआयने घेतलेला निर्णय हा नोटबंदीचा निर्णय नाही. २००० रुपयांच्या कायदेशीर निविदा (legal Tender) म्हणून चालणार आहे. सप्टेंबर महिन्यानंतर जर नोटा असतील तर फक्त एक प्रक्रिया केली जाणार आहे'.

Rs 2000 Notes/file
Devendra Fadnavis Reaction: नोटबंदीच्या निर्णयाबाबत फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "कुणी काळा पैसा..."

'जेव्हा नोटा छापल्या, तेव्हाच कागदाची गुणवत्ता वापरली, त्यानुसार ५ वर्षांनी या नोटा परत घेणार असल्याचे ठरले होते. त्यानुसार २०१८ मध्ये नोटा चालणे बंद झाले झाले होते. बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात वाढतात. त्यामुळे नोटा परत घेतल्या जातात, असे ते म्हणाले.

'आता लोक बँकेच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करतात. पण आता दोन लाखांच्या पुढे असलेल्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. हा सर्व तपशील ईडी या यंत्रणाकडे पाठवतात. बँकांनी प्रत्येक नोट तपासून घेणे आवश्यक आहे. बँकेकडून बनावट नोट आली तर त्याची जबाबदारी बँकेची आहे. त्यावर कारवाई होऊ शकते, असेही अनास्कर यांनी सांगितले.

'या आधी बनावट नोटा हे कारण दिलं गेलं होत. पण तेव्हा जवळपास सर्व नोटा परत आल्या. व्यवहारात जास्त नोटा होत्या हे दिसलं. तेच आत्ताही होऊ शकते, असेही अनास्कर पुढे म्हणाले.

Rs 2000 Notes/file
CM Relief Fund: आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज; शिंदे सरकारचा 'गतिमान' निर्णय

नोट बदलण्याची शेवटची तारीख काय आहे?

२००० रुपयांची नोट बदलण्यासाठी शेवटची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत तुमच्या २००० रुपयांच्या नोटा पाकीटात राहू शकतात. या तारखेपर्यंतच तुम्ही ही नोट बदलून घेऊ शकता.

बँकेत नोट बदलून तुम्हाला त्याच्या जागी वैध चलन दिले जाईल. शेवटची तारीख आणखी वाढवली जाणार की नाही याची माहिती मिळालेली नाही. सध्या तरी २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com