
संजय राठोड
यवतमाळ : डेंग्यू आजाराने राज्यातील अनेक भागात थैमान घातले आहे. अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून यात अनेकांचा जीव (Yavatmal) देखील गेला आहे. याच दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील नेर- आर्णी येथे डेंग्यूच्या (Dengue) आजाराने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. (Maharashtra News)
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरु आहे. आजही अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान यवतमाळ, महागांव, मारेगाव या तालुक्यात आतापर्यंत डेंग्यूने लहान मुलांचा बळी घेतला आहे. परंतु आरोग्य यंत्रणेद्वारे चांगले ठोस उपाययोजना होत नसल्याने साथ आटोक्यात आलेली नाही. यामुळे आणखी तिघांचा बाली गेला आहे.
एकाच दिवशी तिघांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू आजाराने एकाच दिवशी नेर आणि आर्णी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून साहिल खांडेकर, कर्तव्य झांबरे दोघेही राहणार नेर तर जागृती चव्हाण राहणार आर्णी तालुक्यातील मालेगाव असे डेंग्यू आजाराने मृत्यू झालेल्या लहान मुलांचे नाव आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.