Risod Bajar Samiti : रिसोड बाजार समिती दहा दिवस राहणार बंद; नाणेटंचाईच्या कारणातून निर्णय

Washim News : सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत
Risod Bajar Samiti
Risod Bajar SamitiSaam tv
Published On

मनोज जयस्वाल

वाशिम : सध्या नाणे टंचाई भासत असल्याने या कारणाने रिसोड बाजार समिती दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे एन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. बाजार समिती बंद असल्याने भाजीपाला विक्री खासगी बाजार समितीत करावी लागत आहे. 

Risod Bajar Samiti
Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. पेरणीसाठी राखून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे. मात्र अशातच (Washim) वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी नाणे टंचाई जाणवत असल्याच्या कारणातून १३ जूनपासून २२ जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. 

Risod Bajar Samiti
Amravati News : धक्कादायक..चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून महिलेला अमानुष मारहाण; विजेचा शॉकही दिल्याचा आरोप

शेतकऱ्यांची गैरसोय 

शेतकऱ्यांना (Farmer) शेतमाल विक्री करताना गैरसोय व आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच बाजार समिती बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना खासगी बाजारात शेतमाल विकावा लागनार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com