Wardha News : वर्ध्याच्या मुख्य धरणात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा; टंचाईची समस्या मिटली 

Wardha News : यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना सोसावी लागणार नाही. तरीही नागरिकांनी पाण्याचा काळजीने वापर करावा असं आवाहन पाटबंधरे विभागाने केला आहे
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होत काही धरण शंभर टक्के भरले होते. तर (Wardha) वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरणात ७२ टाके पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात भासणारी पाणी टंचाईची समस्या मिटलेली आहे. (Live Marathi News)

Wardha News
Buldhana News : आमदारांच्या दुकानावरची इंग्रजी पाटी अखेर काढली; लागणार मराठी फलक

वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा, बोर आणि महाकाली येथील धाम प्रकल्प हे मुख्य धरण असून या धरणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असते. आजच्या परिस्थितीतही बोर प्रकल्प हे ७१ टक्के, निम्न वर्धा प्रकल्प ७८ टक्के आणि वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारा महाकाली येथील धाम प्रकल्प हा ७२ टक्के भरला आहे. यामुळे यंदा पाणीटंचाईची (Water Crisis) झळ नागरिकांना सोसावी लागणार नाही. तरीही नागरिकांनी पाण्याचा काळजीने वापर करावा असं आवाहन पाटबंधरे विभागाने केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Parola Accident: गावाकडे येण्यासाठी सुरतहून दुचाकीने प्रवास; अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर

सिंचनासह उद्योगानाही मुबलक पाणी
रब्बी हंगामात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पतून (Farmer) शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले जातं असून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता कोणतीही अडचण होताना दिसत नाही. तर दुसरीकडे उद्योगानांही देण्यात येणाऱ्या पाणीत कोणतीही कपात केली जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे या मान्सूनमध्ये झालेल्या पावसाचा फायदा आता सर्वाना होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com