Exam Results: दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता!

औरंगाबाद बोर्डामुळं दहावी आणि बारावीचा निकाल उशीरा लागणार अशी चिन्ह दिसतायत.
Students
Studentsमाधव सावरगावे
Published On

माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद बोर्डामुळं दहावी आणि बारावीचा निकाल उशीरा लागणार अशी चिन्ह दिसतायत. कारण खुद्द औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी सर्वच प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना कारवाई करणार असल्याचं पत्रच पाठवल्याचं पुढं आलंय.

Students
वसईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविली सोलर कार!

निकाल उशिरा लागण्याचे कारण काय?

५ एप्रिल रोजी राज्य महामंडळाच्या अध्यक्षांनी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेतला. त्या आढाव्यात औरंगाबाद विभाग वगळता सर्वंच मंडळाचे ९० टक्के पेपर तपासून झाल्याचं पुढं आलंय. औरंगाबाद बोर्डाच्या दृष्टीनं ही बाब खेदाची असल्याचं अध्यक्षांच म्हणणं आहे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० जून पूर्वी दहावीचा आणि १५ जूनपुर्वी बारावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे.

हे देखील पहा-

...अन्यथा कारवाईचा इशारा;

मात्र, औरंगाबाद विभागाचं संथ हालचालीमुळे निकाल उशीरा लागण्याची भिती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं जे प्राचार्य मुख्याध्यापक हे काम शिक्षकांडून मुदतीत करून घेणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा बोर्डानं दिलाय. इतकंच नाही तर संबंधित शाळांचे मंडळ मान्यता काढून घेण्यात येईल आणि बोर्डाचा सांकेतिक क्रमांकही गोठवण्यात येईल असाही इशारा बोर्डानं दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com