
सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं दोन चिमुरड्यांसह आत्महत्या केली आहे. शेतातील विहिरीत उडी घेत तिनं आपल्या मुलांसह आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, माहेरच्या मंडळींनी सासरच्या सततच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप केला आहे. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हर्षाली राहुल अहिरे (वय २८) असं विवाहित महिलेचं नाव आहे. ती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील रहिवासी होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांना सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता, असा आरोप आहे. तिनं अखेर जाचाला कंटाळून स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. अशी मृत बालकांची नावे आहेत.
या घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी सासरच्या सततच्या मानसिक त्रासामुळे हर्षालीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. यानंतर माहेरच्या मंडळींनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद अशा चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.