
सोलापुर: जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगोला येथील सत्कार कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार शहाजी पाटील यांनी भरसभेत तुफान भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाबाबत बोलताना त्यांनी, "ही जनतेची माणूस म्हणून मोठी चूक आहे," असं म्हणत भरसभेत स्वत:च्या थोबाडीत मारून घेतलं.
पाटलांचा संताप
"लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेनं निवडून दिलं नाही. पाणी आडवणाऱ्या व्यक्तीला खासदार केलं. ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे", असं म्हणत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वत:च्या थोबाडीत मारून घेतली. तसेच सांगोला मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतो, आणि या मतदारसंघात निंबाळकरांचा पराभव झाल्याची सल पाटलांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवली.
अजित पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख
"सांगोला तालुक्यातील येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वीही बोललो आहोत. पाणी कुणी अडवलं, कुणी घेतलं, हे जाहीर सांगितलेलं आहे. आता मात्र, जाहीर सांगणार नाही. कारण त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, माझी अडचण कुणी करू नका", असे म्हणत आमदार शहाजी पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता, उजनीचे पाणी बारामतीला जात असल्याचं अप्रत्यक्ष उल्लेख केला.
भाजपचे उपकार कधीच विसरणार नाही
"सांगोला मतदारसंघात आजपर्यंत कुणीही दिला नसेल, इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असताना मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपचे उपकार कधी विसरणार नाही, संपूर्ण आयुष्य भाजपसाठी तळमळत राहील", असे विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भरसभेत केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.