
महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय.. तब्बल 70 लाख एकर पीकं पाण्याखाली गेलेत.. आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय.. त्यामुळेच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरतेय... त्यातच आता शरद पवारांनी आपल्या आयुष्यात असा ओला दुष्काळ पाहिला नसल्याचं वक्तव्य केल्यानं अतिवृष्टीची दाहकता अधिकच अधोरेखित होतेय.
खरंतर अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय. लेकरासारखं जपलेलं सोयाबीन, उडीद, मूगासह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.. घरं पडली आहेत... जमीन खरवडून गेलीय.. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय.. नेमकं हेच हेरुन पवारांनी आता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी भरपाईचा मार्ग सांगितलाय.
नुकसानग्रस्तांना मदत करणं ही केंद्र आणि राज्याची जबाबदारी
केंद्राच्या योजना वापरुन राज्याने भरपाई देणं गरजेचं
पीकांचे वास्तव पंचनामे करणं गरजेचं
वाहून गेलेली जमीन, पीकं आणि खरडून गेलेल्या मातीची भरपाई द्यावी
गुरं वाहून गेल्यानं त्यासाठी मदत द्यावी
वाहून गेलेले पाणंद रस्ते दुरुस्तीसाठीही मदत द्यावी
तातडीची आणि कायमस्वरुपी अशा दोन पद्धतीची मदत द्यावी
आतापर्यंत मराठवाडा भीषण दुष्काळासाठी ओळखला जायचा.. मात्र आता ऋतूचक्रं फिरलं आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झालीय.. त्यामुळे आधीच नापीकी, दुष्काळामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन ठोस मदत देण्याची गरज आहे... मात्र ही मदत कधी दिली जाणार? याकडे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.