फैय्याज शेख
शहापूर : शहापूर तालुक्यातील अनेक भागात काळ रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नद्यांना पूर आला असून प्रतीपंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या चरीव गावाच्या जवळ असलेल्या कानवे नदीला देखील पुर आला आहे. या पुरामुळे नदीकाठी असलेले तीनही मंदिर पाण्याखाली आले आहे.
पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की या नदीला पूर येतो अतिदुर्गम भागात डोंगराल भागाच्या मध्ये वसलेले हे गाव पावसाळ्यात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोंढे कानवे नदीत मिसळतात. यामुळे या नदीला पूर येत असतो. या पुराच्या पाण्यात मंदिर पुर्णपणे बुडते. काही वेळा नदी काठी असलेल्या घरांमध्ये देखील पुराचे पाणी शिरते. पाऊस पडायचे थांबले कि नदीचे पाणी देखील ओसरत असते.
पहिल्याच पावसात मंदिर पाण्याखाली
चरिव गावात ऐकून तीन मंदिर असून हे मंदिर कानवे नदी आहेत. यामुळे दरवर्षी नदीला पूर आला कि हे तीनही मंदिर पाण्याखाली जातात. कानवे नदीत काठी महादेव, भक्त पुंडलिक आणि मंदिर विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे.
नंदुरबारमध्येही मुसळधार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात देखील काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले आहेत. तर मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पातळगंगा नदीला देखील पूर आला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला असून चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.