
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत ५ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व मोबाइल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. परंतू विष्णू चाटेने अद्यापही सीआयडीला मोबाइल दिलेला नाही. फरार असताना विष्णू चाटेने नाशिकमध्ये मोबाइल फेकून दिला, तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचे तो सीआयडीला सांगत असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. या हत्याकांड प्रकरणाताली आरोपी कृष्णा आंधळे अजूनही मोकाटच आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या, दोन कोटींची खंडणी, मारहाण आणि अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे. हत्या प्रकरणात सात आरोपी अटकेत असून, कृष्णा आंधळे ९ डिसेंबर २०२४ पासून मोकाटच आहे. सीआयडीला या तिन्ही गुन्ह्यांतील एकही आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. सर्व आरोपी हे बीड पोलिसांनीच पकडून दिलेले आहेत.
तर दुसरीकडे चाटेकडून मोबाइल हस्तगत करायचा आहे. त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी केला. तेव्हा आरोपी २४ दिवस तुमच्या ताब्यात आसताना त्याचा मोबाइल हस्तगत करता आला नाही. मग काय केले? असे ताशेरे न्यायमूर्ती कुणाल जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर ओढले आहेत.
दरम्यान, बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना यातील ८ आरोपींवर मोका देखील लावण्यात आला आहे. यादरम्यान आता या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी, तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर देखील कलम ३०२ अंतर्गत तसेच मोकाअंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी आज मस्साजोग येथे ग्रामस्थांची बैठक होणार आहे. या बैठकीत ग्रामस्थ नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.