Maharashtra: 'सकाळी राज ठाकरेंचा फोन आला अन्..' मोर्चासंदर्भात नेमकं काय ठरलं? राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Raj and Uddhav Thackeray: त्रिभाषा सूत्राविरोधात ठाकरे बंधू एकत्र येत असून, मराठी अस्मितेसाठी ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.
Thackeray Brothers
Role of Thackeray brothers in Marathi language protection movementSaam TV News
Published On

त्रिभाषा सुत्रावरून राज्यातील मराठीवर्ग पेटून उठला आहे. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर सरकारने घातलेला घाट उधळून लावण्याचा विडा ठाकरे बंधूंनी उचलला आहे. मराठी अस्मितेसाठी ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. खासदार संजय राऊतांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. दरम्यान, हे ठरलं केव्हा? यासंदर्भातील माहिती आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी दिली.

कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मोर्चा आणि उद्धव ठाकरेंनी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, ठाकरे बंधू आज एकत्र मोर्चासाठी मैदानात उतरणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. 'राज ठाकरेंनी मला फोन केला होता. मराठी भाषेसाठी २ मोर्चे निघणं योग्य नाही, यासाठी एकच मोर्चा निघायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर उद्धव ठाकरेंना माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आढेवेढे न घेता यासाठी सहमती दर्शवली. मराठी ऐक्य दिसायला हवं, असं उद्धव ठाकरे म्हणाले', अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

Thackeray Brothers
Shocking: शिवमंदिरात पुजाऱ्याची भयानक हत्या; रक्ताने माखलेला मृतदेह पाहून भक्त भयभयीत, गावात खळबळ

'राज ठाकरेंनी ६ जुलैला मोर्चा काढू असं सांगितलं. त्यांनतर मी त्यांना पुन्हा फोन केला. ६ तारखेला आषाढी एकादशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज ठाकरेंनी ५ जुलै ही तारीख ठरवली', अशी माहिती राऊतांनी दिली.

'येत्या ५ जुलैला मोर्चा निघेल, सकाळी १० ही योग्य वेळ नाही. यासंदर्भात आम्ही चर्चा करू, वेळेच्या बाबतीत आणि ठिकाणाचीही चर्चा करू, असं आम्ही ठरवलंय', असं संजय राऊत म्हणाले.

Thackeray Brothers
Car Romance: महामार्गावर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, कारच्या सनरूफवर उभं राहून लिपलॉक; VIDEO तुफान व्हायरल

राज- उद्धव ठाकरे मनाने एकत्रच - संजय राऊत

हिंदी भाषा सक्तीविरोधातील मुद्दा पेटल्यानंतर ठाकरे बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली. ५ जुलैला पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत या मोर्चाबाबत माहिती दिली. तसेच ठाकरे बंधू मनाने एकत्र असल्याचं सांगितलं. 'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करेन, असं सांगितलं. कालच्या बैठकीत त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. ५ जुलैला एकत्र मोर्चा काढणार, ठाकरे बंधू मनाने एकत्रच आहेत', असं सूचक विधान संजय राऊतांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com