Sanjay Raut: 'महाविकास आघाडी फुटली असं म्हटलंच नाही' संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलं

Sanjay Raut on MVA: काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टिकेबद्दल संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस नेत्यांनी माझं बोलणं नीट ऐकायला हवं होतं. त्यांनी ऐकण्याची पण सवय लावायली हवी, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News
Sanjay RautSaam tv
Published On

ठाकरेंची शिवसेना आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केले होतं, त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. यावरून आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा वक्तव्य करत घुमजाव केलेय. मविआ, इंडिया आघाडी तुटली असे म्हटलोच नाही, काँग्रेस नेत्यांनी माझं वक्तव्य व्यवस्थित ऐकायला हवं होतं, असा टोला त्यांनी लगावला.

महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली होती. ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीत भूकंप आलाय का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काँग्रेस नेत्यांकडूनही राऊतांसह ठाकरे गटाला लक्ष्य करण्यात येत होते. या सगळ्या घडामोडींवर स्पष्टीकरण देत, काँग्रेसच्या काही नेत्यांना टोला लगावला आहे.

काँग्रेस नेत्यांनी माझं बोलणं नीट ऐकायला हवं होतं. त्यांनी ऐकण्याची पण सवय लावायली हवी, एखाद्या व्यक्तीचं म्हणणं ऐकणं मोठी गोष्ट असते, असा टोला प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी लगावला आहे. 'मी कधीही म्हटलं नाही, की महाविकास फुटली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी आम्ही एक भूमिका मांडत आहोत, असं म्हणत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं.

Sanjay Raut News
Solapur News: वधू-वरांना जेवण, ९५० वर्षांची परंपरा, पुरणपोळीचा नैवेद्य; कसा असतो योगदंडाचा पूजन विधी सोहळा?

पुढे राऊत म्हणाले, पक्ष प्रमुख सर्वांच्या भावना जाणून घेत आहेत. मी फक्त एवढंच म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वांनी इंडिया आघाडी तयार बनवली. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडी तयार केली. भाजपसोबत असताना देखील आम्ही एकटे लढलो होतो. काँग्रेस नेत्यांनी आमचं विधान ऐकायला हवं होतं, त्यांनी ऐकण्याची पण सवय लावायली हवी, असं संजय राऊत म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगळी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची संधी मिळाली तर पक्षाचा विस्तार होऊ शकतो. ३-४ पक्ष मिळून एकत्र लढवत असतील तर, कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. आमचं निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही इंडिया आघाडी फुटली किंवा महाविकास फुटली असं म्हटलं नाही. आम्ही आमत्या कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com