सांगली - कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली

सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि पावसाची संततधार यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Sangli News
Sangli NewsSaam Tv

सांगली : सांगलीच्या (Sangli) चांदोली धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि पावसाची संततधार यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.

Sangli News
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील 'या' मंत्र्यांना मिळणार मोठी खाती; वाचा संपूर्ण यादी
Summary

शालेय विद्यार्थी वारणा व कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा कर्मचारी वर्ग चिकुर्डे मार्ग जात आहेत. सध्या वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पुराचे पाणी पात्रा बाहेर आल्याने नदी काठावरील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. संततधार पावसामुळे ओढा, वगळी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर शेती पिकात पाणी साचून राहिले आहे. ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस पाटील ऐतवडे खुर्दने नदी काठावरील लोकांना सतर्कचा इशारा दिला असून प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे सांगितले आहे.

Sangli News
धक्कादायक : मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचीच केली हत्या

चांदोली धरण भरल्याने धरणातून 5600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्वतवाडी येथील लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना प्रत्यक्ष भेटून ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहे. कुरळप पोलीस (Police) पूर परिस्थितीची पाहणी करून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. संततधार पावसामुळे नदी काठावरील लोकांना महापुराची धास्ती लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com