रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...
रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका... Saamtv

रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ ची पूर परिस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
Published on

सांगली : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये आलेली पूरस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली आहे. राज्यातील पुरस्थितीचे महाविकास आघाडी सरकारने योग्य नियोजन केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी बोलणी करून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास भाग पाडले आहे, असेही ते म्हणाले.

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज रोहित पवारांनी पाहणी केली. तसेच या भागातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे व किटचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.

रोहित पवारांनी फडणवीसांवर केली 'हि' टीका...
माध्यमांविरोधात शिल्पा शेट्टीने दाखल केला अब्रू नुकसानीचा दावा !

महाराष्ट्रातील पुरस्थितीमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तमपणे काम करत असून, यंदा जलसंपदा विभागाचा अंदाज चुकला नाही. या पुरस्थितीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाने चांगले काम केले आहे. असे गौरवोद्गारही आमदार रोहित पवार यांनी काढले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com