'वसंतदादांचे सरकार मी पाडलं', शरद पवार जाहीर सभेत पहिल्यांदाच बोलले; नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Flashback: शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार मीच पाडले, अशी कबुली दिली. सरकार पाडूनही वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला.
Sharad Pawar Flashback
Sharad Pawar FlashbackSaam Tv news
Published On
Summary
  • शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार मीच पाडले, अशी कबुली दिली.

  • सरकार पाडूनही वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला.

  • पवारांनी पूर्वीचे राजकारण आणि आताच्या परिस्थितीची तुलना केली.

  • गांधी-नेहरूंचे विचार पुन्हा मांडून देशाचा चेहरा बदलण्याची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूतकाळातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार मीच पाडले, अशी थेट कबुली दिली.

शरद पवार म्हणाले, 'वसंतदादा हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते. आम्ही यशवंत चव्हाणांच्या विचाराने स्वर्णसिंह काँग्रेसमध्ये होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न झाले. पण त्याला आम्हा तरूणांचा विरोध होता. त्यामुळेच आम्ही दादांचे सरकार पाडले आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो', असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Flashback
नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

राज्यात १९७८ साली पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोदचा प्रयत्न झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वसंतदादांचे सरकार पडले होते. यात शरद पवारांचा मोठा हात होता. शरद पवारांनीच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा अनेकदा आरोप केला जात होता. याच मुद्द्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

पवार पुढे म्हणाले, 'दहा वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो. मुख्यमंत्री कुणाला करायचं यावर चर्चा सुरू होती. तेव्हा दादांनी स्पष्ट केलं की आता इतर कोणाची चर्चा नाही, पक्षाला सावरण्यासाठी नेतृत्व शरदकडे द्यायचं. म्हणजे ज्यांचे सरकार मी पाडलं, त्याच दादांनी गांधी-नेहरूंच्या विचारांना पुढे नेण्यासाठी मला पाठिंबा दिला', असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Flashback
मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

पूर्वी मोठं मन होतं, आता संसदीय कामकाजच बंद

पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणाची तुलना करताना पवार म्हणाले, 'त्या काळी मोठ्या मनाने राजकारण केलं जात होतं. आज मात्र, राजकर्त्यांकडूनच संसदेचं कामकाज बंद पाडलं जातं. हे संसदीय लोकशाहीला शोभणारं नाही. पुन्हा एकदा गांधी - नेहरूंच्या विचारांची मांडणी करून देशाचा चेहरा बदलायचा आहे', असंही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com