सचिन कदम
रायगड : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यात दिरंगाई होत आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने पेण मध्ये भिकमांगो आंदोलन करण्यात आले.
राज्यात सर्वदूर यंदा मुसळधार पाऊस झाला. पावसाची संततधार सुरु राहिल्याने शेतांमध्ये पाणी साचले होते. परिणामी शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने पिके उध्वस्त झाली होती. काही शेतकऱ्यांचा शेतात केलेला खर्च देखील निघणे कठीण आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पडली असून काहींना मदतीची प्रतीक्षा आहे. अर्थात शासनाकडून दिरंगाई केली जात आहे.
निषेध करत भिकमांगो आंदोलन
अतिवृष्टी दरम्यान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल. उभ्या पिकासह सुपीक जमीन वाहून गेली आहे. अनेक कुटुंब यात उध्वस्त झाले आहेत. आता दिवाळी सारखा सण देखील साजरा करण्यावर सावट उभे आहे. असे असताना देखील शासनाकडून अजूनही मदत पोच केली जात नाही. याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने रायगडच्या पेणमध्ये भिक मांगो आंदोलन केले.
जमा झालेली रक्कम दिली जाणार मदत निधीत
पेण बाजार पेठेत फिरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भिक मागितली. यानंतर जमा झालेले हे पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधि मध्ये पाठवले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.