- सागर निकवाडे
नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रांग - शेवाळी महामार्गाची (netrang shewali highway) दुरावस्था झाली असल्याने अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करा अन्यथा जनआंदोलन उभा करू असा इशारा नंदुरबार शहरातील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिला आहे. (Maharashtra News)
गेल्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले आहेत. या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांची दुरवस्था आणि अवजड वाहनांची वाढलेली संख्या हाेय. याच महामार्गाचे चौपदरी करण्याच्या काम संथ गतीने सुरू आहे.
त्यामुळे रस्ता चौपदरीकरण लवकर करण्यात यावा अन्यथा शहरातील संघटना आणि नागरिक जन आंदोलन करण्याच्या इशारा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन महामार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यात यावा अन्यथा महामार्गावरून प्रशासन आणि नागरिकांमधील संघर्ष वाढणार हे मात्र निश्चित.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.