
पापलेट म्हटलं कि, मत्स्यहारी खवय्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल....छान चव, रुचकर, अन्य माशांच्या तुलनेत कमी काटे आणि भरपूर पोषणमूल्ये असल्याने पापलेट हा दर्दी, आणि नवख्यांचाही आवडीचा मासा... मात्र आता हाच पापलेट मासा तुमच्या ताटातून गायब होणार आहे...राज्य मासा म्हणून दर्जा लाभलेला 'सारंगा' अर्थात 'सिल्वहर पापलेट मासा' सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा मासा नामशेष होण्यामागे नेमकी कारणं काय पाहूयात...
पापलेट मासा किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आहे. मोठया प्रमाणात या माशाची निर्यात होते. मात्र पालघरमधील सातपाटी मच्छीमार सोसायटीच्या आकडेवारी नुसार गेल्या 12 वर्षात पापलेटच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. 100 ग्रॅमच्या आत असलेल्या पिल्लांचीच मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्यानं अर्धा किलोहून अधिक वजनाच्या मोठ्या आकाराचा पापलेट सापडण्याच्या प्रमाणात 95 टक्के घट झाली आहे. उत्पादन निव्वळ पाच टक्क्यावर आले आहे.
मच्छिमार संघटना -
मुळात स्थानिक पातळीवर या माशाचे उत्पादन घटत असल्याने त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने त्याला राज्य मासाचा दर्जा देण्यात आला. मात्र वास्तव वेगळे आहे.
कमी होत चाललेला हा चविष्ट पापलेट मासा वाचवण्यासाठी सरकार नेमकी काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसचं मच्छिमार संस्था, व्यावसायिकांचीही जबाबदारी आहे. पापलेट प्रजातीच्या संवर्धनासाठी त्यांच्या पिल्लांची मासेमारी थांबवणं काळाजी गरज बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.