-- कैलास चौधरी
उस्मानाबाद : तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातल्या अणदूर इथल्या वत्सलानगर भागात बालविवाह होणार असल्याची चाहूल लागताच बालविवाह प्रतिबंधक समितीने संबंधितांच्या घरी जाऊन पालकांचे प्रबोधन करत येथील बालविवाह (child marriage) रोखला आहे समितीच्या या सतर्कतेमुळे बालविवाह वेळीच रोखले आहेत.
हे देखील पहा :
याच अणदूर गावातील काही दिवसांपूर्वी बाल विवाहामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्य झाल्याची साम टिव्ही ने दाखवली होती. त्या प्रकरणी संबधित नातेवाईकांवर गुन्हे दाखल झाले त्यानंतर देखील अणदूर गावात बाल विवाह होत होता.
अणदूर येथे 19 नोव्हेंबर ते आज 21 नोव्हेंबर या काळात चार बालविवाह होणार असल्याची चाहूल अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती यांना लागली. ही बाब ग्रामविकास अधिकारी देवीदास चव्हाण यांना देण्यात आली. त्यानंतर संबधित पालकांचे आणि नातेवाईकांचे मनपरिवर्तन करत हे चारही बाल विवाह रोखण्यात आले. त्यासोबतच बालविवाह रोखण्यासंदर्भात जनजागृती काढण्यात आली.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.