Eknath Khadse on Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून एकनाथ खडसे यांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले? वाचा

Eknath Khadse on Maratha Reservation: 'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार टाळटाळ करीत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

Eknath Khadse on Maratha Aarakshan

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण अधिकच तीव्र केलं आहे. याच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंद सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार टाळटाळ करीत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Eknath Khadse
Maharashtra All Party Meeting: मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यावर एकमत; OBCतून आरक्षण देण्यासंदर्भात विचार नाही!

जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत शिंदे सरकारने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकावर टीका करताना एकनाथ खडसे म्हणाले, 'शिंदे सरकार मराठा समाजला आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे सरकारला हा प्रश्न चिघळवायचा असल्याचे दिसून येत आहे'.

'लोकामध्ये संताप निर्माण होण्याअगोदर शासनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरूस्ती करून हा प्रश्‍न तातडीने सोडवावा, असे मत राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर खडसे म्हणाले, 'विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची कालमर्यादा निश्‍चित करावी आणि त्या कालावधीतच निकाल द्यावा. मग ज्याला त्यावर अपील करायवयाचे असल्यास ते अपील करू शकतात. परंतु केवळ सुनावणीला विलंब करण्यासाठी तारीख पे तारीख करण्यात येत असेल तर त्याला अर्थ राहणार नाही'.

Eknath Khadse
All Party Meeting on Maratha Reservation: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का? सर्वपक्षीय बैठकीत एकमुखानं कोणता ठराव झाला?

तत्पूर्वी, जळगावात सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत भाजपने राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर खडसे म्हणाले, जिल्ह्यात रस्त्याचे, तसेच इतर उद्घघाटन करताना भाजपला कधीही आमदारांना, खासदारांना बोलवावे असे वाटत नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com