नाशिक : नाशिक शहर व परिसरात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नाशिक शहरापासून जवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाताना लगतच्या डोंगरावरून अचानक दगड कोसळले. यावेळी ब्रम्हगिरीवर जात असलेल्या भाविकांच्या अंगावर दगड पडल्याने तीन भाविक जखमी झाले. सुदैवाने यात मोठी दुर्घटना टाळली आहे.
नाशिक शहर आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. शिवाय शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जोरदार पावसामुळे डोंगर परिसरात दरड कोसळत आहेत. ब्रह्मगिरी किल्याच्या मुख्य पायऱ्यांनी जाताना डाव्या बाजूला असलेला डोंगरकडा सुटला आहे. तेथे निखळलेले दगड उतारावर जमा झाले आहेत. धबधबा असलेल्या या ठिकाणी माकडांची धावपळ झाल्यास दगड खाली घसरून पडतात.
नवविवाहित दाम्पत्य बचावले
दरम्यान मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ब्रह्मगिरी पर्वतावर दगड कोसळला आहे. यात विशाल प्रतापसिंह गिरासे आणि जयश्री विशाल गिरासे या नवविवाहित दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली. वरून दगड पडल्याने जयश्रीच्या हातावर मार लागला. यात त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. तर विशाल यांच्या डोक्यावर खोल जखम झाली असून हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे.
यापूर्वीही घडलीय घटना
तसेच तेथे असलेल्या नेहा डावरी यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या घटनेवेळी काही भाविक बालंबाल बचावले आहेत. यापूर्वी देखील त्याच ठिकाणावर दगड पडले आणि एका भाविकाचा जीव गेला होता आणि काही भाविक जखमी झाले होते. त्याच जागेवर पुन्हा ही घटना घडलीय. यामुळे येथे फिरायला जाणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.