Nandurbar News : सात वर्षांपासून २ हजार ८२९ सिंचन विहिरींचे कामे अपूर्ण; नंदुरबार जिल्ह्यातील चित्र

Nandurbar News : पावसाळा कमी झाल्याने यंदा पाणी टंचाईची परिस्थिती भीषण झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत आहेत.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : मनरेगाअंतर्गत ग्रामीण भागात सिंचन विहिरींना मंजुरी दिली जात असते. हि प्रक्रिया दरवर्षी केली जात असून नंदुरबार जिल्ह्यात या अशाच पद्धतीने विहिरी मंजूर झाल्या. परंतु जिल्ह्यात मागील सात वर्षात तब्बल २ हजार ८२९ विहिरींचे काम अपूर्ण असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे पाणी टंचाईच्या काळात या विहिरींचा काही उपयोग होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Nandurbar News
Latur Water Scarcity : लातूर जिल्ह्यातील ८ पैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडे; शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

पावसाळा कमी झाल्याने यंदा पाणी टंचाईची परिस्थिती भीषण झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत आहेत. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील भीषण (Water Scarcity) पाणी टंचाईची समस्या वाढत आहे. दरम्यान टंचाईवर पर्याय म्हणून शासनाच्या वतीने विहिरी खोदण्यासाठी अनुदान दिलं जात असते. परंतु हे अनुदान मिळाल्यानंतर देखील विहिरींचे काम पूर्ण होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Nandurbar News
Amalner crime : शेत रस्त्यावरून वाद; मारहाणीत एकाचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत मागील ७ वर्षात १३ हजार ५२ सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी ८ हजार ४८७ कामांना प्रत्यक्ष सुरुवात होऊन ५ हजार ६५८ विहिरींची शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. तर २ हजार ८२९ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण आहेत. तांत्रिक अडचणीमुळे जिल्हाभरात सन २०२३ आणि २४ मध्ये सर्वाधिक १ हजार १४२ विहिरींचे काम रखडलेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com