Crop Insurance: मिरची पिकालाही हवे पीक विम्याचे कवच; शेतकऱ्यांची मागणी

Nandurbar News मिरची पिकालाही हवे पीक विम्याचे कवच; शेतकऱ्यांची मागणी
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
:  मिरची पिकाला विमा पिक विमा नसल्याने मिरचीचे झालेल्या नुकसानीचा भरपाई शेतकऱ्यांना (Farmer) मिळत नसते. त्यामुळे अनेक वेळा टाकलेले भांडवलही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडत असतात. मिरची पिकाचा पिक विमा (Crop Insurance) योजनेत समाविष्ट करण्याची मागणी जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (Live Marathi News)

Crop Insurance
Satara : रात्रीच्या सुमारास सावित्रीच्या लेकींनी आंदाेलनाचे हत्यार उपसले अन् अधिका-यांचे डाेळे उघडले; घटना वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, एसटी महामंडळ Shame Shame...

राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात येत असते. दरवर्षी मिरचीचे लागवड क्षेत्र वाढत असले तरी सरकारच्या वतीने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती आणि मिरची पिकावर येणाऱ्या विविध विषाणूजन्य आजारांमुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत येत असतात. 

Crop Insurance
Pune Cyber Crime: पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे खाते हॅक

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना द्या आधार 

मागील हंगामात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन झाले असून मिरची तीन लाख क्विंटल उत्पादनाचा टप्पा पार केला होता. मात्र यावर्षी पावसाचे अनियमितता आणि काही प्रमाणात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी सरकार शेतकऱ्यांचे सरकार असे म्हणण्यापेक्षा मिरची सारख्या पिकाचा पिक विमा समाविष्ट करून शेतकऱ्यांना आधार द्यावा; अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com