संजय सूर्यवंशी
नांदेड : शेतकऱ्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ न करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. यामुळे शेतकरी निराश झाला असून राज्य सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्जफेडीसाठी अवयव विक्री काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतामध्ये जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा खोदला आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. निवडणूक झाली आणि महायुतीने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटली आहेत. परंतु महायुती सरकारने अद्याप शेतकऱ्यांची कर्ज माफी केली नाही. दरम्यान ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांच्या विधाना नंतर राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहेत.
शेतातच खोदला खड्डा
दरम्यान कर्ज भरण्यासाठी किडनी विकणे आहे; अशा आशयचे बॅनर वाशीम येथील एका शेतकऱ्याने आपल्या गळ्यात बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदवीला होता. त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी या गावातील शंकर जाधव पाटील या शेतकऱ्याने कर्ज माफीच्या मागणीसाठी आपल्या शेतात जिवंत समाधी घेण्यासाठी खडा खोदाला आहे यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तर ३ एप्रिलला जिवंत समाधी
शेतकरी शेतीसाठी कर्ज घेत असतो. परंतु अस्मानी संकट व मालाला कमी मिळणाऱ्या दरामुळे कर्जफेड करता येणे शक्य नाही. यात सरकारकडून कर्जमाफी न देण्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यातूनच शेतकरी आता टोकाचे निर्णय घेत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी सरकारने केली नाही, तर येणाऱ्या ३ एप्रिलला शेतात जिवंत समाधी घेणार असल्याचा इशारा शेतकरी शंकर पाटील यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.