Maharashtra Politics: राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांची फडणवीसांनी उत्तरं द्यावी, संजय राऊत संतापले

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या ईव्हीएमबाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.
Raj Thackeray- Sanjay Raut
Raj Thackeray- Sanjay RautSaam TV
Published On

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांबद्दल आणि ईव्हीएमसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. झालेले मतदान गेले कुठे? हे रहस्य असल्याचं त्यांनी भाष्य केलंय. भाषणावेळी राजू पाटील यांचं उदाहरण त्यांनी दिलं. पाटील यांच्या गावातील हक्काची मतं कुठे गेलीत? राजू पाटील यांच्या गावातच १४०० मते होती, मात्र एकही मत मिळू नये हे आश्चर्यकारक असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा तक्रारी शेकडो गावागावातून आली आहेत. ही जादू कशी झाली? हे निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

'महाराष्ट्र आज संकटात आहे. राज्य संपवण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. शिवसेना तोडायची, ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या नावाचं वलय आणि ताकद राज्यात आहे, त्या विरोधात दिल्लीतली उभी आहे. अशा वेळी सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही. या संदर्भात भूमिका घेणं सर्वच राजकीय पक्षाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस आयोगाने द्यायलाच पाहीजे', असं संजय राऊत म्हणाले.

Raj Thackeray- Sanjay Raut
Nagpur News: असला कसला राग? वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे चिडला, १० वर्षांच्या मुलानं घर सोडलं

राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलं. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या ईव्हीएमबाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. 'त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत. त्याला विरोध करावा असं काही नाही. राज्यात विरोधासाठी विरोध अशी लाट आहे. त्यातून बाहेर पडलं पाहिजे', असंही संजय राऊत म्हणाले.

Raj Thackeray- Sanjay Raut
Maharashtra Politics: शिंदे गटाच्या नेत्याला धक्का! अपक्ष उमेदवाराकडून कोर्टात धाव, विजयाला दिलं आव्हान

'राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील की नाही हे त्यांच्या भाषणावर कसं सांगणार? त्यांच्या भविष्यातील भूमिका काय असतील, त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केलं. त्या मुद्द्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही वारंवार सांगतो राज ठाकरे यांची भूमिका भाजपधार्जिणी. एकनाथ शिंदे धार्जिणी आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे तिकडे जातात हे राज्याच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं. पण तरीही आम्ही त्यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवू', असं देखील संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com