

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय...आणि याला कारण ठरलयं.... मंत्री उदय सामंत यांनी केलेला एक खळबळजनक दावा... ठाकरेसेनेचे अनेक आमदार शिंदेंची भेट घेतात, अस म्हणत... सामंतांनी ठाकरेसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार येत्या 2 महिन्यात फुटणार असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे निष्ठेवर तुम्ही बोलू नये, शिंदेंना भेटणं पाप आहे का? असा सवाल ठाकरेसेनेच्या अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय...
दुसरीकडे मुंबई महापालिकेनंतर शिंदेसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप एकटं पाडेल, असं म्हणत रोहित पवारांनी सामंतांवर चांगलाच हल्लाबोल केलाय....
गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाची जाहीर वाच्यता करण्यामागे शिंदेसेना आणि ठाकरेसेना आघाडीवर आहे... शिरसाटांनी ठाकरेसेनेचे 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता... तर आदित्य ठाकरेंनी शिंदेसेनेचे 22 आमदार भाजपचं फोडणार असल्याचं सांगितलं होतं... त्यामुळे राज्यात खरचं पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? या भुकंपाची धग नेमकी कोणाला बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.