Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच शाळेतील मुलही भावुक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच शाळेतील मुलही भावुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झालेत.

उद्या दोन्ही नेते मुंबईतून थेट बारामतीला अंत्यविधीसाठी पोहचतील

तर राज ठाकरे आज पुण्यात मुक्कामी उद्या सकाळी बारामतीला जात घेणार अंतदर्शन

आज पुण्यात रामदास आठवले, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे, योगेश कदम, दादा भुसे मुक्कामी

तर उद्धव ठाकरे आज रात्री उशिराच बारामतीला जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता

हा निव्वळ अपघात - शरद पवार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार आहेत.

पुण्यात सर्किट हाऊस येथे मुक्कामी असणार

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी पुण्यातून जाणार

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बारामतीला जातील

गडचिरोलीत शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

गडचिरोली_लाहेरी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास ;

७० विद्यार्थ्यांना विषबाधा उपचारासाठी रुग्णालयात दाखल

भामरागडच्या ग्रामीण रुग्णालय व लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काही विद्यार्थ्यांचा उपचार सुरू आहे

अकरा वाजताच जेवण झाल्यानंतर दुपारपासून या विद्यार्थ्यांना मळमळ व उलटी होऊ लागली

सध्या सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती स्थिर असली तरी विषबाधा कोणत्या खाद्यपदार्थातातून झाली याची तपासणी शिक्षण विभाग करीत आहे

दादांच्या धाकाने आम्ही बैठकीला उपस्थित राहायचो- दादा भुसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत येणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी वायुसेनेच विमान बारामती दाखल झालं

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या अंत्यविधीची तयारी सुरू

रोहित पवार यांच्यासह राज्य सरकार चे अनेक अधिकारी उपस्थितीत

अजित पवारांचे पार्थिव याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवले जाणार आहे

उद्या सकाळी याच मैदानावर अंत्यविधी केले जातील

बारामतीच्या विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे , दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले, आमदार राहुल कुल, रणजीतसिंह नाईक निंबाळकर दाखल

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या निधनाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना अश्रू अनावर

उपमुख्यमंञी अजीत पवार यांच्या अकस्मात निधनाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना ही आपले अश्रू अनावर झाले.

दाटलेल्या कंठाने हितेंद्र ठाकूरांनी दिला दादांच्या आठवणींना उजाळा

दादा म्हणजे आमच्या ठाकूर कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे घरचे सबंध

मनाला चटका लावणारी ही घटना आहे. स्पष्ट पण प्रेमळ, राजकारणाच्या पलिकडचा माणूस असल्याची प्रतिक्रीया हितेंद्र ठाकूरांनी दिली.

केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे विमानतळावर दाखल

केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे

विमानतळावर दाखल सोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

अजित पवार यांच अपघाती निधन

विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त

अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राज्यातील सर्व शाळांना आज सुट्टी

मावळ तालुक्याच्या माजी आमदार रूपरेखा ढोरे यांचं  निधन

मावळ तालुक्याच्या माजी आमदार रूपरेखा ढोरे यांच अल्पशा आजाराने निधन

1995 साली त्यांनी आमदार म्हणून मावळचा नेतृत्व केलं होतं

देवळाली प्रवरा गावात बंद!

अजित पवारांच्या आजोळात शोककळा

देवळाली प्रवरा गावात बंद

देवळाली प्रवरा गावात झाला होता अजित पवार यांचा जन्म

तीन महिन्यापूर्वीच अजित पवार यांनी आजोळात केला होता दौरा

आज आणि उद्या पुणे शहर राहणार बंद!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच निधन

महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आज आणि उद्या पुणे बंद

उद्या मार्कटेयार्ड ही राहणार बंद

अजितदादा एक निर्भीड व स्पष्ट व्यक्तिमत्व मंत्री-- भरत गोगावले

महाड प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा बारामती जवळील विमानात अपघातामध्ये झालेल्या मृत्यूने संपूर्ण राज्यावर संकट कोसळले असून एक निर्भीड व स्पष्ट व्यक्तिमत्व आपल्यातून हरपल्याची भावना राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या शोकसंदेशांमध्ये व्यक्त केली आहे.

असा दुर्दैवी मृत्यू कोणाच्या आयुष्यात घेऊन ये मात्र विधी लिखित कोणी टाळू शकत नाही आपण तमाम जनतेच्या वतीने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनां व्यक्त केल्या.

देवेंद्र फडणवीस यांची पेण मधील सभा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण मधील सभा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर निधनाची बातमी समजताच सभा रद्द करण्याचा निर्णय

एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे सर्व दौरे रद्द

आज सकाळी अजित पवारांचे दुःखद निधन झाले. या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.

रायगडमध्ये 1484 प्रतिबंधात्मक कारवाई; निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात तब्बल 1 हजार 484 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, 16 जणांना तडीपार तर 16 जणांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील 1 हजार 429 शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अजित पवारांच्या विमानाला अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात

सुरक्षारक्षक, अजित पवार आणि वैमानिक विमानात असल्याची माहिती

लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती

Buldhana: शेकडो निराधार बेघर मनोरुग्णांचा वाढदिवस एकाचवेळी जल्लोषात साजरा

राज्यभरातील निराधार, बेघर मनोरुग्णांना त्यांचा हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी बुलढाण्यातील अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नी ज्योती काकडे यांनी गेल्या बारा वर्षांपूर्वी दिव्या फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम करत आहेत.. बुलढाण्याच्या वरवंड येथील दिव्या फाउंडेशनच्या आश्रमामध्ये 200 पेक्षा अधिक महिला पुरुष बेघर मनोरुग्ण वास्तव्यास आहेत, त्यांच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून विविध उपचार केले जातात, त्या यापैकी 700 पेक्षा अधिक मनोरुग्णांना आजारातून बरे करून त्यांना स्वगृही पाठवण्यात दिव्या फाउंडेशनला यश आले आहे.. समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमधून या मनोरुगांचा सध्या सांभाळ होत आहे.. या मनोरुग्णांना आली जन्मतारीख देखील माहित नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल बिल्लारी यांनी आपला वाढदिवस याच सर्व निराधार मनोरुग्णांसोबत साजरा केलाय..

Raigad: देवेंद्र फडणवीस यांची आज रायगडच्या पेणमध्ये सभा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रायगडचा पेण मध्ये सभा..

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भाजप सह मित्र पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधणार...

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच कोकणात सभा..

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पेण मध्ये सभेचे आयोजन..

Daharshiv: रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आंदोलनाला बसणार,बाळराजे आवारे पाटलांचा निर्धार

आंदोलन बाळराजे आवारे पाटील यांच्यावर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू

ईव्हीएम हटाव यासाठी धाराशिव च्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपलं

पोलिसांच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करत आहे

माझी कसल्याही पद्धतीने प्रकृती खालावलेली नाही मी पोलिसांना डॉक्टरला बोलून चेक करा म्हणत होतो

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मशीनवर घेण्याऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्या ही आमची मागणी होती

आमचा लढा निवडणूक आयोग सोबत होता, ईव्हीएम हटवलोकतंत्र वाचवा या आमच्या मागणीवर ठाम

रात्री दोन वाजता शंभर पोलिसांचा पाऊस फाटा आला आणि आमचे सुरू असलेले आंदोलन त्यांनी मोडीत काढलं बाळराजे आवारे पाटील यांचा आरोप

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 24 आरोपींना अटक उर्वरित आरोपींचा शोध सुरू

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 74 कर्मचारी दोषी असताना प्रत्यक्षात 28 कर्मचाऱ्यांवरतीच प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर आक्रमक झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांसह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यामुळे हक्कभंग आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जालन्यातील अंबड आणि घनसांगी तालुक्यात 2022 मधील शेतकऱ्यांचे जवळपास 24 कोटी अतिवृष्टी अनुदान तलाठी आणि इतर कर्मचारी लाटण्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि चौकशी समिती नेमून 74 कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं मात्र यापैकी केवळ 28 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आतापर्यंत 24 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मर्ज होणार

मोहोळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांचं मोठं विधान.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादीची युती झाली.

'आतली गोष्ट सांगतो, बारामतीत अजित दादांसोबत आमची बैठक झाली. त्यावेळी जिल्ह्यातील चार आमदार आणि एक खासदारासह दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बैठकीला उपस्थित होतो'

तीन महिन्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याची घोषणा करता आली नाही

यवतमाळात कापूस- सोयाबीनचे भाव घसरले तुरीला अच्छे दिन

कापूस सोयाबीन या प्रमुख पिकाचे दर सध्या कोसळत असताना तुरीचे दर वाढत असून गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात वाढ झालीये तुरीचे दर आठ हजारांवर पोहचले आहे. आणखी दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकीकडे तुरीच्या उत्पादनात घड झाली असून अशात तूरीच्य भावात वाढ होताहेत त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

- राज्य शासन आणि याचिकाकर्त्याचा संस्थेला २ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश

- मराठी शाळा बंद होण्याची समस्या केवळ नागपूरपुरती मर्यादित नसल्याचे नागपुर खंडपीठाचे निरीक्षण

- शाळा आणि मराठी भाषा वाचवायची असेल तर शासनाकडे ठोस ‘ब्लू प्रिंट’ असणे गरजेचे

अमृता फडणवीस यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अंजली भारतींवर गुन्हा दाखल करावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद, हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचाकडे केली. या मागणीचे निवेदन स्वीकारत पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली असून, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम

शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे

माघारीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील लढतींचे अंतिम चित्र समोर

जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार उभे राहिले आहेत

इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडणूक जाहीर झाल्यापासूनच माघारीच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते

पंचायत समितीसाठी एकूण १,११८ इच्छुकांनी १,४२४ अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या तीन दिवसांत पहिल्या दिवशी १२, दुसऱ्या दिवशी २४, तर अखेरच्या दिवशी तब्बल ५५४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. परिणामी १४६ जागांसाठी ५२८ उमेदवार शिल्लक राहिले असून, त्यामध्ये २५४ महिला आणि २७४ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

हवामानात सातत्याने चढ-उतार

गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने चढ-उतार होत असताना आता हवामान लक्षणीय बदल झाला आहे.

ऐन जानेवारीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांसह हवामान विभागानेही वर्तवली आहे

राज्यातील सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे जानेवारीत कमाल-किमान तापमानात सातत्याने चढ-उतार झाले आहेत.

त्यामुळे कधी थंडी वाढल्याचे, तर कधी थंडी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. आता पुन्हा एकदा हवामान बदल्याने तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रभावामुळे पावसाची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com