धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच मोठ नुकसान झाल होत यामध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील तब्बल ३८ हजार शेतकऱ्यांचे ४१ कोटी रुपये अनुदान हे रखडले होते.अखेर या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.ऐन हंगामात खात्यात पैसे जमा होवु लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.२०२४ मध्ये दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी होवुनही प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव नाकारला होता त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर याला यश आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजुर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस असून आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला आहे.. संगमनेर तालुक्यातील निझर्नेश्वर या ठिकाणी आंदोलक मुक्कामी होते.. आज या ठिकाणाहून हे लाल वादळ थेट पालकमंत्री विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे कुच करणार आहे.. मात्र त्यापूर्वी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला असून शिष्टमंडळाबरोबर अधिकारी चर्चा करणार आहेत.. चर्चेनंतरच नेमकं या आंदोलनात तोडगा निघतो की आंदोलन पुढच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार हे स्पष्ट होईल..
कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पण त्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन
दुपारी मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ आणि अन्य मंत्री उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित
थोड्याच वेळात कुसुमाग्रज प्रतिष्ठान पासून ग्रंथदिंडीला होणार सुरुवात
देश-विदेशातील मराठी भाषिक संमेलनात होणार सहभाग
नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात संमेलनासाठी भव्य मंडपाची उभारणी
जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड २० मार्च आत करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.या निवडीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी १३ मार्च ही बैठकीची तारीख निश्चित केली आहे.तर आठ पंचायत समिती सभापती,उपसभापती निवडी सहा मार्चला होणार आहे.त्यासाठी आठ पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी.
बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील प्रकार.
पुण्यातून आलेल्या तीन ते चार युवकांनी एक जणाला बेदम मारहाण करत केला गोळीबार
मारहाण केल्यानंतर तीन ते चार युवक पुण्याच्या दिशेने झाले फरार..
सदर जखमी युवकाला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात केलं भरती
बार्शी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल..
पुणे ते बँकॉक विमान सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद असणार
उन्हाळी वेळापत्रकात पुणे बँकॉक आणि बँकॉक टू पुणे दोन्ही उड्डाणे तात्पुरती बंद
29 मार्च 2026 पासून सुरू होत आहे उन्हाळी वेळापत्रक त्यात दोन्ही सेवा बंद करण्यात आल्याची माहिती
इंडिको विमान कंपनीने ही सेवा बंद केल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासाला याचा फटका बसणार आहे
ई समर्थ पोर्टलमुळे थांबलेला निधी पुणे जिल्ह्यातील आमदारांना अर्थ खात्याकडून मंजूर
स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीची फाईल अखेर आर्थिक त्यांनी मंजूर केली आहे
पुणे जिल्ह्यातील 24 आमदारांना आता स्थानिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
पुणे जिल्ह्यात ई समर्थ पोर्टल द्वारे निधी देण्याचा प्रायोगिक प्रयोग करण्यात येत आहे त्यामुळे हा निधी थांबला होता
पहिल्या टप्प्यात अर्थ खात्याने 50 कोटीचा निधीही ई समर्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे
जिल्ह्यातील राहुड येथे सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशन संजय इंगळे, वय 36, याने खामगावातील रवी देवीदास राऊत यांच्या मदतीने धाकटा भाऊ चेतन इंगळे, वय 35, याचा खून केल्याची कबुली दिली आहे. २५ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकडांवर जाळून राख व अस्थी नदीत फेकण्यात आल्या. चेतन बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे...या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...
मावळच्या तळेगाव दाभाडे येथील सिल्वर विंग अपार्टमेंट परिसरात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या चार नवीन लिफ्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना फलाटवर ये-जा करणे आता अधिक सोयीचे झाल
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित शुल्क भरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक वाहनधारकांनी दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असून अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.
शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन मोठा निर्णय घेणार आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना पुण्यात प्रवेश बंदी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविणार आहेत.त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांना पुण्यात धावता येणार नाही.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुण्यात सहा लाख ८३ हजार ४११ खासगी संवर्गातील, तर ४६ हजार २८४ परिवहन संवर्गातील वाहनांचे आयुर्मान १५ वर्षांहून अधिक आहे. यात सर्वाधिक दुचाकी आहेत. दुचाकींची संख्या पाच लाख १२ हजार ५७५ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.