Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे अर्ध्या रस्त्यातूनच फिरले माघारी; मुंबईत न जाण्याचं सांगितलं कारण

Manoj Jarange News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे.
Manoj JArange-Devendra FAdnavis
Manoj JArange-Devendra FAdnavisSaam TV
Published On

Manoj Jarange Patil Latest News

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे. अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ तसेच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj JArange-Devendra FAdnavis
Breaking News: जालन्यात भल्यापहाटे पोलीस धडकले; मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक ताब्यात, परिसरात मोठी खळबळ

सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जालन्याच्या भांबेरी गावातून अंतरवाली सराटीकडे निघाला आहे. आज म्हणजेच सोमवारी दुपारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संचाबंदी उठवा मुंबईत येऊन दाखवतोच असं आव्हान देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील भांबेरी गावातून माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी ५ ते १० हजार पोलिसांचा बंदोबस्त उभा केला आहे. ते आम्हाला मुंबईत जाऊ देणार नाहीत". (Latest Marathi News)

"मी मुंबईत जाण्याचा प्रयत्न केला, तर मराठा आंदोलकांना त्रास होईल. मी कोणत्याही मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे पोरांना त्रास होईल, असं मी वागणार नाही. आम्ही अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवू", असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.

दरम्यान, सागर बंगला सरकारी असून तिथे कुणीही येऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना "मला सागर बंगल्यावर बोलावून फडणवीसांनी मोठी चूक केली आहे", असं जरांगे यांनी म्हटलं आहे. संचारबंदी उठवा मुंबईमध्ये येऊन दाखवतोच, असं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.

Manoj JArange-Devendra FAdnavis
Jalna News: जालन्यात मराठा समाज आक्रमक; अंबड तालुक्यात एसटी महामंडळाची बस पेटवली, थरारक VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com