गेल्या 17 दिवसांपासून जरांगे पाटील अंतरवालीत उपोषणाला बसलेत...अशातच सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस भूमिका न घेतल्यानं जरांगेंनी हजारो मराठा आंदोलकांसह 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला होता. मात्र मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांंदा परवानगी नाकारल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदललीय. जरांगेंनी आता एकटेच मुंबई गाठण्याचा निर्धार केलाय.. इतकचं नव्हे तर सरकाराला प्रतिआव्हानंही दिलयं....
दुसरीकडे जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात त्यामुळे त्यांनी गणेशोत्सव काळात आंदोलन करणं योग्य नाही असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलीय.. त्यालाच जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांवर पलटवार केलाय...
दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आणि सरकारच्या दबाबामुळे जरांगेंनी काय रणनीती आखलीय...पाहूयात.
जरांगे एकटेच मुंबईच्या दिशेने निघणार
प्रवासात त्यांच्यासोबत जास्तीत जास्त 1 ते 2 गाड्या आणि आपत्कालीन वापरासाठी 2रुग्णवाहिका असतील.
5 ते 10 पेक्षा जास्त माणसे जरांगेंसोबत नसतील
मराठ्यांनी मुंबईला कधी पोहचायचं यासंदर्भात सूचना जरांगे मुंबईत पोहचल्यानंतर देतील
मुंबई पोलिसांनी सुरक्षेचं कारण पुढे करत
जरांगेंना आंदोलनाची परवानगी नाकारली असली
तरी पोलिसांनी निर्णयाचा फेरविचार करावा, असा अर्ज मराठा आंदोलकांनी पोलिसांना दिला... मात्र तो अर्जही पोलिसांनी नाकारल्यानं आता जरांगे एकटेच मुंबईत आंदोलनासाठी येणार, हे जवळपास निश्चित आहे...कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून जरांगेंनी हा निर्णय घेतला असला तरी मराठा समाज जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की कुटनितीचा अवलंब करत मराठेही जरांगेंपाठोपाठ मुंबई गाठणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.