Sanjay Raut On BJP: अयोध्येतील श्री राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षा जानेवारीमध्ये या मंदिराचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. याच पाश्वभूमीवर संजय राऊत यांनी राम मंदिराच्या लोकार्पणावेळी हिंसाचार होण्याची शक्यता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वर्तवली आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी याबद्दल भाजपवर गंभीर आरोप केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनावेळी भाजपा (BJP) सरकारकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो.. अशी शक्यता जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी वर्तवली होती. लातूरच्या सभेत उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) मलिकांच्या या वक्तव्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता राऊतांनीही यावर मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय.." असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
तसेच यावेळी पुढे बोलताना "अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे. इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत.." असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.