Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं

Maharashtra Politics Latest News: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार करण्याच्या विचारात असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
Bachchu KaduSaam TV
Published On

सोलापूर, ता. २९ जुलै २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार करण्याच्या विचारात असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
Maharashtra Politics: अजित पवारांचा सर्वात मोठा खुलासा, महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय केलं?; सर्व काही सांगितलं

काय म्हणाले बच्चू कडू?

"आम्ही स्वतःची आघाडी करण्याचा विचार करतोय. सध्यातरी अजून युतीमध्ये आहोत, 9 तारखेला आम्ही आमची ताकद दाखवू . त्यानंतर निर्णय घेऊ, आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका, आम्ही पहिली आघाडी आहोत मुळ शेतकऱ्यांची आघाडी, असे म्हणत आमचे 16 मुद्दे आहेत ते जर मान्य होतं असतील तर कोणीही मान्य करेल त्या आघाडी युतीला आमचा पाठिंबा असेल," अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.

विधानसभेला तिसरी आघाडी!

तसेच "ज्या योजना काँग्रेस सरकारने करण्याचा प्रयत्न केला, तेच जर युती करणार असेल तर काय अर्थ आहे. आम्ही मुद्यावर लढतोय आम्हाला विधानसेभेची अपेक्षा नाही. आमचा मुद्दा मान्य झाला तर आम्ही ज्यांनी तो मान्य केला त्यांना पाठिंबा देऊ," असेही बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे.

Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
NCP MLA Disqualification: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची आज सुनावणी; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलणार का? सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

दरम्यान, :महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची भिती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. यावरही बच्चू कडू यांनी महत्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे तशी स्थिती महाराष्ट्रामध्ये येईल असं मला वाटतं नाही, शरद पवारांनी असं विधान का केलं माहिती नाही," असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu: 'विधानसभेत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असणार', बच्चू कडूंचे मोठे विधान; पाठिंबा कुणाला? सांगूनही टाकलं
VIDEO: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुण्यातून जाणाऱ्या एक्सप्रेस रद्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com