Maharashra Politics: मंत्रिमंडळ निर्णयाचा फेरविचार करा; राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

Maharashra Politics: कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आ
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Saam tv
Published On

Vijay Wadettiwar News:

'सरकारने फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने पिकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे की, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी? असा सवाल करत मंत्रिमंडळ निर्णयाचा फेरविचार करावा आणि कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकराने सरकारने फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारच्या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी पिके नष्ट झाली आहेत. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना गत वर्षीचे देय अनुदान सरकारने अद्याप दिले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vijay Wadettiwar
Drought in Maharashtra: मोठी बातमी! राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये जाहीर केला गंभीर दुष्काळ

'खरिप हंगाम हा अत्यंत वाईट गेला आहे. त्यात अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामाची शाश्वती नाही. चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. शेतकऱ्याला या परिस्थितीत मदत करण्यासाठी सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. यामुळे सर्वांना दुष्काळाचे लाभ मिळतील. याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले.

Vijay Wadettiwar
Jarange Patil Latest News: मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही, सरकारने उद्याच अधिवेशन बोलवावं: मनोज जरांगे पाटील

'केवळ पिकविमा कंपन्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का? असं काही असल्यास हा निर्णय मागे घ्यावा. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे ते म्हणाले.

'राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून चुकीची आकडेवारी दाखवत सरकारने या 40 तालुक्यांची निवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला शेतकरी कदापी माफ करणार नाही, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com