Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये धो धो पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

शिवनदीत वाहून जाणारा व्यक्ती बचावला

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र नदी ना पूर आला आहे लासलगाव मधून वाहणाऱ्या शिव नदीला पूर आल्याने घरी जायचे कसे या विवचेत असल्याने ऐका वृद्ध व्यक्तीने पुरात उडी मारली मात्र सुदैवाने तो पुरात पोहत घरी पोहचला,थोडक्यात देव तारी त्याला कोण मारी ही म्हण या व्यक्ती च्या बाबतीत खरी ठरली.

जालन्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर

जालन्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात दोन लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून गावातील नागरिकांचे स्थलांतर दुसऱ्या गावात करण्यात येत आहे. अंबड तालुक्यातील गंगाचिंचोली , कोठाळा, गोंदी , हसनापूर या गावासह गोदाकाठच्या गावकऱ्यांच स्थलांतर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक...

अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान...

शेती पिकांसह अनेक नागरिकांच्या घरात घुसले पाणी...

नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत बैठक...

पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.

पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा , महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांचे आदेश. जिल्ह्यात उद्या देखील पावसाचा रेड अलर्ट . अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना प्रशासनाच आवाहन .

रायगडच्या कर्जतमध्ये भातशेतीच्या नुकसानीची भिती

सद्या सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील भातशेतीला देखील बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी दुपारी कर्जतमध्ये जोरदार पाऊस झाला या पावसाचा कर्जतच्या कशेळे या भागात भातशेतीला बसला आहे. भाताच तयार असलेल उभ पिक पावसाच्या माऱ्यामुळे शेतात आडवे झाले आहे. हि परिस्थिती अशीच कायम राहिली तर शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास मातीत जाण्याची भिती शेतकऱ्याला निर्माण झाली आहे.

धुळे जिल्ह्यात पावसाचा कहर

पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पालकमंत्री तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकाची शेताच्या बांधावर जाऊन केली पाहणी

राज्य सरकार व केंद्र सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची मंत्री जयकुमार रावल यांनी दिली शेतकऱ्यांना ग्वाही

केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे जास्तीत जास्त मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली जाईल म्हणत मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना दिलासा

काल झालेल्या पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील केळी व पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले होते नुकसान

पंढरपूर -

पूरग्रस्तांना मदतीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने १ कोटी रुपयांचा निधी जाहीर

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक कोटी रुपये जमा करणार.....

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती....

पूरग्रस्तांना महावस्त्र देखील वाटप करणार....

मंदिर समितीचा निर्णय.....

प्रत्येक वेळी किंवा महापूर झाल्यानंतर मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये दिली आहे मदत....

Kolhapur: कोल्हापुरात तृतीय पंथी व्यक्तीचा हैदोस, पोलिसांना शिवीगाळ करत केली मारहाण

कोल्हापूर -

कोल्हापुरात तृतीय पंथी व्यक्तीचा हैदोस

जबरदस्ती पैसे मागून गोंधळ घालणाऱ्या तृतीय पंथाला पोलिसांनी रोखलं

पोलिसांनी रोखण्याचा राग मनात धरून संबंधित तृतीय पंथी व्यक्तीने पोलिसांना शिवीगाळ करत केली मारहाण

Ahilyanagar: ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत केली पाहिजे, निलेश लंके यांची सरकारकडे मागणी

अहिल्यानगर -

ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत केली पाहिजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची सरकारकडे मागणी

पंचमी केले जातात मात्र ते कागदपत्रे केल्याने मदत मिळत नाही -लंके

नगर शहरातील पूरग्रस्त भागाची निलेश लंके यांनी केली पाहणे

अहिल्यानगर शहराचा जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपलं

शेवगाव -पाथर्डी तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी ओढ्यांना पूर

शेवगाव-पाथर्डी सह जिल्ह्यात पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान

गोदा घाटावरील कंटेनर गोदावरीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला

- रामतीर्थ गोदावरी समितीचा गोदा घाटावरील कंटेनर गोदावरीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला

- गोदावरीच्या आरतीसाठी लागणारी सामुग्री ठेवण्यासाठीचा कंटेनर वस्तूंसह गेला वाहून

- आरतीला लागणारी सर्व सामग्री गेली पुराच्या पाण्यात वाहून

- गोदावरी नदीत कंटेनर वाहून जातानाचा विडिओ समोर

- यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर गोदावरी नदीला आल्याने नदीने रौद्ररूप केलंय धारण

डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे २ डबे वेगळे झाले

पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे झाल्याची घटना . मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेसचे डबे निघाले . सुदैवाने मोठी दुर्घटना टळली . प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण. डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम . डाऊन मार्गावरील वाहतूक चाळीस मिनिटं ठप्प .

भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी वर्षा बंगल्यावर जाणार

भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी वर्षा बंगल्यावर जाणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नाराजी सूर वर्षा बंगल्यावर

नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चाचं नियोजन

वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा महानगरपालिकेत सत्ता यावी ॲक्शन मोडवर

साईबाबा संस्थानकडून राज्यातील शेतकरी अन् नागरिकांना १ कोटी रूपयांची मदत जाहीर

आपत्कालीन परिस्थितीत साईबाबा संस्थान मदतीसाठी सरसावले...

साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर...

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे नुकसान...

सामाजिक बांधिलकी जपत साईबाबा संस्थानने जाहीर केली 1 कोटींची मदत...

धुळे जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी हवामान विभागाचा रेड अलर्ट

धुळे जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी हवामान विभागाचा रेड अलर्ट

सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाला धुळ्यात सुरुवात

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले होते नुकसान

त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे आणखी शेती पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

खडकपूर्णा नदीला पूर, मलकापूर - सोलापूर राज्यमहामार्ग मार्ग बंद

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण खडकपूर्णा हे असून ते 100 टक्के भरले असल्याने धरणाचे 19 दरवाजे 1 मिटरने उघडण्यात आल्याने मलकापूर सोलापूर हा राज्यमहामार्ग बंद झाला आहे...

15 वर्षानंतर देऊळगावमही जवळील 50 उंचीच्या पूर्वरून पाणी वाहायला लागल्याने मार्ग बंद झाला आहे.. खडकपूर्णा नदीला पूर आल्याने नदी काठावरील 33 गावाना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत..

सीना नदी परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे शहरात पाणी घुसले-आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले...अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय...नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीये...1996 नंतर पहिल्यांदाचा शहरातील नेप्ती चौकात पाणी आले आहे...अहिल्यानगरच्या सीना नदीच्या शेजारील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे...नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून अतिक्रमणाबाबत अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही संपूर्ण पुराचे परिस्थितीबाबत न्यायालयाला अवगत करून न्यायप्रविष्ठ प्रकरणा संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली पाहिजे असं शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे सोबतच शहरातून वाहणाऱ्या नदीचे पाणी वाढत असल्याने कोणीही फोटो काढण्यासाठी त्या परिसरात जाऊ नये आणि धोका पत्करू नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.

Nashik: पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृध्द दापंत्याला केले रेस्कयू

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे येवला तालूक्यातील कोळगंगा नदीला मोठा पूर आल्याने या पुराचे पाणी शेतीसह अन्य भागात घुसले,नदी लगतच्या गवळी वस्ती येथे नाना सैंदर व साखरबाई सैंदर हे दोन वृध्द दांपत्य पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाने स्थानिक तरुणांच्या मदतीने रेस्कयु ऑपरेशन राबत दोघा वृध्दा सुखरुप बाहेर काढले.

रेल्वेरुळ खचल्याने गंगाखेड परळी मार्गावरील रेल्वेची वाहतूक बंद

रेल्वेरुळ खचल्याने गंगाखेड परळी मार्गावरील रेल्वेची वाहतूक बंद

गंगाखेड तालुक्यात वडगाव स्टेशन ते पडेगाव रेल्वे गेट जवळ घडली घटना

परभणी, गंगाखेड वरून परळी कडे धावणाऱ्या 5 गाडया केल्या रद्द, सहा गाड्या अंशतः रद्द तर आठ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, रेल्वेचे अधिकारी दाखल

नांदेड - पनवेल, औरंगाबाद गुंटूर, अमरावती पूल या गाड्यांचे मार्ग बदलले

रेल्वेरुळ खचला, परळी मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद

रेल्वेरुळ खचल्याने गंगाखेड परळी मार्गावरील रेल्वेची वाहतूक बंद

गंगाखेड तालुक्यात वडगाव स्टेशन ते पडेगाव रेल्वे गेट जवळ घडली घटना

परभणी, गंगाखेड वरून परळी कडे धावणाऱ्या 5 गाडया केल्या रद्द, सहा गाड्या अंशतः रद्द तर आठ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, रेल्वेचे अधिकारी दाखल

नांदेड - पनवेल, औरंगाबाद गुंटूर, अमरावती पूल या गाड्यांचे मार्ग बदलले

मराठवाड्यातील प्रसिध्द कथाकार आणि ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ.भास्कर चंदनशिव यांच निधन

धाराशिव च्या कळंब तालुक्यातील हासेगाव येथील रहीवाशी असलेले भास्कर चंदनशीव यांचे लातुर येथील हॉस्पिटलमध्ये आज दुपारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन

भास्कर चंदनशीव यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापुर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात व बीड मधील बलभीम महाविद्यालयात दीर्घकाळ मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केली

साहित्यिक भास्कर चंदनशीव यांनी ग्रामीण समाजातील स्थित्यंतरे चिञीत केली - त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह,ललीत,समीक्षा आणि संपादन आहेत

अखील भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनासह मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते

भास्कर चंदनशिव हे शालेय पाठय़पुस्तकातील त्यांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे व्यथा दाखवणाऱ्या 'लाल चिखल' या कथासंग्रहातुन घराघरात पोहचले

अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस

अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस...

पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला....

नेवासा तालुक्यातील सोनई गावातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी...

बाजारपेठेच्या रस्त्याला नदीचे स्वरूप...

अनेक दुकाने पाण्याखाली...

नेवासा - शेवगाव तालु्क्यांना जोडणारा पुल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला...

सर्वदूर पाऊस कोसळल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान

झाडांवर सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब, शेतकरी हतबल 

वाशिम जिल्ह्यात सुरू झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने अनेक शेतशिवारांचा प्रचंड नुकसान झाल आहे. यातून काही वाचलेलं पीक हे पण आता संपण्याच्या मार्गावर आहे, आणि आता सुरू असलेल्या पावसामुळे वाशिमच्या मानोरा तालुक्यातील तळप शेतशिवारातील सोयाबीनच्या झाडांवरच आता हिरव्या शेंगांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातात आलेले पीक सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नुकसान होत असताना कोणत्याचं विभागाचा कर्मचारी,अधिकारी शेताच्या बांधावर पोहोचला नाही.

बेंबळा धरणाचे १४ दरवाजे उघडले; बेंबळा नदीत पाण्याचा विसर्ग

गेल्या काही दिवसांपासून बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या सततच्या पावसामुळे धरणाच्या जलपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यवतमाळच्या बाभुळगांव तालुक्यातील बेंबळा धरणाचे १४ दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. बेंबळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून,स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

आज पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

आज पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत पुणे घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.नागरिकांनी सतर्क राहावे.मंत्रालय, मुंबई. वरील माहिती मौसम वेबसाईट वरून घेतलेली आहे.

पंढरपूर जवळच्या मोडनिंब परिसरात मुसळधार पाऊस

परिसरात येथील‌ ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मोडनिंब येथील वेताळ ओढ्याला पूर आला. पुरामुळे मोडनिंब - करकंब मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. अशा धोकादायक पुलावरून गावकरी आणि विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून ये जा करत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तुफान पाऊस जनजीवन विस्कळित भात शेती पाण्याखाली

रात्री पासून तुफान पाऊस पडत आहे यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेला खास हिरावून जात आहे

परतीच्या तुफान पावसामुळे भात शेती वाहून गेली आहे . डोंगरावरील पाणी नदी नाले वाटे शेतात शिरल्याने काही दिवसांवर भात कापनीवर आले असताना संपूर्ण भात शेती ही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे महसूल विभागाने याचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांची शेती गेली खरडून

दर्यापूरच्या थिलोरी गावातील, कपाशी सोयाबीनचे पीक पाण्याखाली

शेतजमीन खडून गेल्याने शेतातील कपाशी पिकाचे मोठे नुकसान

दिवाळी पूर्वी जर आम्हाला हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली नाही तर एकाही आमदार,खासदार लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही.शेतकऱ्यांचा थेट लोकप्रतिनिधींना इशारा..

आम्हाला मदत द्या नाहीतर मरनाची परवानगी द्या थेट मुख्यमंत्र्यांकडेच इच्छा मनाची शेतकऱ्यांनी केली मागणी

Ulhas river: रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ

काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हास नदीचे पाणी 14 मीटर वरून वाहत असून इशारा पातळी 16.50 मीटर इतकी आहे. उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली गेलीय. हवामान विभागाने दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलय. नागरिकांनीही सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतय.

Palghar: सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले

सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले . धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू . सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100% भरलं . तर कवडास धरण ओवर फ्लो . धरणांमधून सूर्या नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.

Virar: विरारच्या पश्चिमेकडील मुख्य विवा कॉलेज मार्गावर मोठे झाड कोसळण्याची घटना

विरारच्या पश्चिमेकडील मुख्य विवा कॉलेज मार्गावर मोठे झाड कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

मात्र बाईक चालकांकडून झाडाच्या खालूनच दुचाकी वाहने काढत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. रस्त्याच्या फुटपाथ पर्यंत पाणी साचल्यामुळे दोन झाडे अचानक सकाळी कोलमडून पडली

मुख्य रस्त्यावरील झाड कोसळल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर या रस्त्यावरून येणाऱ्या चालकांना युटर्न घेऊन पर्यायी मार्गाने जावे लागत आहे.

अतिवृष्टीमुळे झेंडूच्या फुलशेतीचे नुकसान

दसऱ्याच्या तोंडावर हातातोंडाशी आलेलं पिक पाण्यात...

राहाता तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका...

फुलशेतीत गुडघाभर पाणी...

राहाता तालुक्यात काल रात्रीपासून अतिवृष्टीचे थैमान...

रस्ते पाण्यात गेल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला...

गावाबाहेरून जाणाऱ्या ओढा नाल्याना नदीचे स्वरूप...

काल रात्रीपासून 125 मिमी पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती...

पूर्ण राहता तालुक्यात शंभर टक्के नुकसानीचा अंदाज.

Navi Mumbai: सकाळपासून नवी मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरूवात

सकाळपासून नवी मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरू झाली आहे

वाशी बेलापूर खारघर नेरूळ उरण ऐरोली या भागात पाऊस रिमझिम पडत आहे

नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाला आहे

आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे दोन्ही महानगरपालिकेकडून करण्यात आवाहन आला आहे

Lonavala: लोणावळ्यात 24 तासात 88 मिलीमीटर पावसाची नोंद

मावळा सह लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे लोणावळ्यात 24 तासात 88 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

राज्यात सर्वत्र स्पर्धेचा पाऊस सुरू असून वातावरणातील बदलामुळे सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे .

हवामान विभागाच्या विभागाने 30 सप्टेंबर पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान मावळच्या घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस असल्यामुळे नदी नाल्यांनाही महापूर आलेला आहे.

मावळा सह लोणावळ्यातही रात्रभर पाऊस पडत आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे....

युवाशेतकऱ्यांनी शेतातील उपटली कपाशीची झाडे, नुकसान भरपाई न दिल्यास आत्महत्या करण्याचा दिला इशारा

शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला कर्ज काढून शेती केली पण आता नदीचे पाणी शेतात शिरल्याने सर्व काही उध्वस्त झालं पीक वाचवणे अशक्य झालं म्हणून शेतातील कपाशीची झाड उपटण्याच्या पर्याय युवा शेतकऱ्यांनी निवडला सरकाराने आम्हाला हेक्टरी 50 हजार रुपये मोबदला दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा देखील युवा शेतकऱ्यांनी दिलीय.

रस्ता दुरुस्तीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं अनोख आंदोलन

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव ते कळमगव्हाण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या या गड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे, आणि त्या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो.

प्रशासन,लोकप्रतिनिधीकडे वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीने रस्त्यावरील गड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रस्ता दुरुस्तीसाठी अनोखा आंदोलन करण्यात आलं.. यावेळी या आंदोलनात गावकरी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका मदत कार्यासाठी सज्ज

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी मुख्यालयासह सर्व विभागांमधील आपत्ती निवारण कक्ष यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी बचाव व मदत कार्यासाठी सज्ज राहावे असेही निर्देश दिले आहेत.

Nashik: नाशिक जिल्ह्यात संततधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले

नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले असून पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे पहावयास मिळत मनमाड जवळच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरात असलेल्या कांद्याच्या शेतात पाणीच पाणी साचले असून शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे

Palghar: पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा

28 ते 29 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले आहे.

मध्यरात्रीपासूनच विजांच्या कडकडासह पावसाने जोरदार पडण्यास सुरुवात केली आहे.

वसई विरार शहरात सकाळपासून मुसलदार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखलभाग जलमय झालेले आहेत.

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्ट

मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

समुद्रात वादळजन्य परिस्थिती उद्भवू शकते मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 59.24 मिमी इतका सरासरी पाऊस

30 सप्टेंबर पर्यंत रत्नागिरीत पावसाचा इशारा

अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तोळणूरमध्ये घराची भिंत कोसळून तिघे जखमी

सततच्या पावसामुळे चढावर असलेल्या अहमदपाशा पिरजादे पाटील यांची दगडी घराची भिंत शेजारच्या भारताबाई उन्नद यांच्या घरावर कोसळल्याने घडली दुर्घटना

या दुर्घटनेत उन्नद कुटुंबातील एक लहान मुलगा आणि दोन महिला जखमी असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून घराची पडझड झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.

कर्जत नगरपालिकेच्या परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मुसलदार पाऊस पडत असल्यामुळे

कर्जत नगरपालिकेच्या परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी साचला आहे

त्यामुळे काही सोसायटींमध्ये पाणी गेलेलं आहे

अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात ठीक ठिकाणी रात्रभर पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणची वाहतूक ठप्प..

नद्या नाल्या ओसांडून वाहत असून काही ठिकाणी गावात शिरले नदीचे पाणी....

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आणि जेऊर गावात नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प...

जिल्हा प्रशासनाचे आवाहन कामाशिवाय बाहेर पडू नका..

Solapur: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ; सोलापूर - मुंबई विमानसेवा तिकीट बुकिंगला झाली सुरुवात

येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या उड्डाणाची सर्व 72 सीट्स झाल्या बुक ; कालपासून सुरु झाली होती बुकिंग

आठवड्यातील चार दिवस सोलापूर - मुंबई विमानसेवेचा लाभ घेता येणार

स्टार एअरलाईन्स या वेबसाईटवर सोलापूरकरांचा बुकिंगला मिळतोय चांगला प्रतिसाद

आठवड्यातील मंगळावर,बुधवार,शुक्रवार आणि शनिवार या दिवशी मुंबईसाठी विमानसेवा असेल सुरु

Dharashiv: धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका

जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड

130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान

तर 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती

Jalna: जालन्यातील वरुड शिवारात मुसळधार पाऊस, द्राक्ष बागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी

जालन्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे खरिपातील पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील अडचणी सापडला आहे . द्राक्ष बागांवर करपा, डावणी यांसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने याचा फटका उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील हवालदील झाला आहे. जालन्यातील वरुड शिवारातील द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने द्राक्ष बागा देखील धोक्यात आल्या आहे

Beed: नारायणगडावरील मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

बीड च्या श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडावरती गतवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्याच आयोजन केलं असून यावर्षीच्या मेळाव्यावरती पावसाचे सावट आहे.मात्र मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवढ्याच ताकतीने लाखो समाज बांधव मेळाव्यास उपस्थिती लावणार असून मोठ्या उत्साहात मेळावा होणार असल्याचे गडाचे महंत शिवाजी महाराज व मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले आहे.नारायण गडावरील पार्किंग सह 350 एक करा वरती हा दसरा मेळावा होणार असून मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अशी माहिती ही देण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात 2 जागीच ठार 2 तर 2 गंभीर जखमी

वाशिमच्या कारंजा जवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीये, संभाजीनगर वरून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने पिकअप गाडीला मागून जोडदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात पिकअप वाहतील 2 जन ठार झाले तर ट्रकमधील 2 जन गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ चॅनल क्रमांक 213 वर झाला आहे.

पीकअप हा टमाटे घेऊन नागपूर कडे जात होता..तर आयशर ट्रक हा छत्तीसगड जात असताना भरधाव ट्रक ने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याच सांगितल्या जातंय..

बार्शी तालुक्याला रात्रभर पावसाने झोडपलं,आगळगाव मधीलचांदणी नदी झाली ओव्हर फ्लो

- आगळगाव येथील चांदणी नदीवरून शेतकरी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

- चांदणी नदीवर पुराचं पाणी आल्यामुळे ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यासाठी करावी लागत आहे कसरत

- आगळगाव येथील चांदणी नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी

- दरम्यान,सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद कांदा पिकाचे मोठे नुकसान..

Pune Rain Update: आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

आज दिनांक 28/09/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून औरंगाबाद, जळगाव, पुणे , रत्नागिरी येथे पुढील ३ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद

- शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट- वागदरी वाहतूक बंद

- अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही वाहतूक बंद झालीय

- आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे

अतिवृष्टीचा फटका! नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक ठप्प

शिर्डी परिसरात महामार्ग गेला पाण्याखाली...

ओढ्या नाल्यांना पूर...

नागरिकांची तारांबळ...

परिसरातील शेती पाण्याखाली...

काल रात्री ओढ्यात दोन जण गेले होते वाहून...

एकाला वाचवण्यात यश तर दुसऱ्याचा शोध सुरू...

स्थानिकांनी दिली माहिती...

Nashik: हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून सर्वत्र जोरदार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट नंतर नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून सर्वत्र जोरदार पाऊस बरत असून मनमाड शहर प परिसरात रात्री पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पांझन व रामगूळना नदीला पूर आला आहे,3 दिवसांपूर्वीच वागदर्दी धरण ओव्हर फ्लो झाले होते त्यानंतर रात्रीतून झालेल्या पावसाने नद्या ना पूर आला असून एक पूल पाण्याखाली गेलाय

धाराशिवच्या भुम मधील बेदरवाडी गावाला जोडणारा पुल तुटल्याने गावचा संपर्क तुटला

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भुमच्या बेदरवाडी गावाला जोडणार पुल तुटला आहे त्यामुळे या गावाचा भुम ला जा ये करणारा संपर्क पुर्णपणे तुटला आहे.अतिवृष्टीमुळे परीसरात मोठ नुकसान देखील झालय, तर पुराच्या पाण्यात वाहुन आलेल्या जनावरे देखील या तुटलेल्या पुलाच्या भागात अडकल्याच चित्र पाहायला मिळत

Hingoli: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रमाला गेले आणि पुरात अडकले

वसमत तालुक्यातल्या डोनवाडा येथे काल एका महिलेचा अंत्यविधी झाल्या नंतर आज स्मशानभुमीत सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या महिला व नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते गावकऱ्यांच्या मदतीने स्मशानभूमीत सावडण्यासाठी गेलेल्या महिला व नागरिकांना पुराच्या पाण्यातून दोरीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थांनी केले .या गावात लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळे गावापासून लांब असलेल्या ठिकाणी अंत्यविधी करावी लागते हा त्रास मागील अनेक वर्षभरापासून चालू आहे अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही स्मशान भूमी मिळत नाही दरम्यान स्मशानभूमी सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या नागरिकांना अचानक पुराच्या पाण्याने वेढा घातला त्यामुळे हे नागरिक जवळपास दोन तास पुराच्या पाण्यात अडकले होते

भामरागड पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे 100 गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला

पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे भामरागड ते आलापल्ली रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे वारंवार होत असलेल्या पुरामुळे नागरिकाकडून असंतोष निर्माण होत आहे नवीन पुलाची निर्मिती लवकरात लवकर करून नागरिकांना सोयीसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नवीन पुलाचे काम संत गतीने चालू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Jalna: जालन्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस, खरिपातील पिके पाण्याखाली

जालन्यात अनेक भागांमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे या पावसामुळे पुन्हा एकदा खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहे. जालन्यातील वझर सराटे या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्याने खरीपातील सोयाबीनसह कपाशी पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात काल मध्यरात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे..

मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडले

अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे, जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरणांची पातळी देखील वाढली पश्चिम विदर्भातील सगळ्यात मोठ्या समाजाल्या जाणाऱ्य अमरावती जिल्ह्यातील मोर्शी अप्पर वर्धा धरणात 98 टक्के जलसाठा झाल्याने व पावसाचा ओघ वाढत असल्याने अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी सात दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेली आहे. यामुळे आसपासच्या गावांना व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे परंतु मागील दोन दिवसापासून काही ठिकाणी सतत आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान्य पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे

शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे व झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झालेला आहे

शारदीय नवरात्र उत्सवात सहाव्या माळे निमित्त तुळजाभवानी मातेची मांडली मुरली अलंकार महापूजा

तुळजापुरात नवरात्र उत्सवात सहाव्या माळे निमित्त तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी मुरली अलंकार महापूजा खुली होती.ही पुजा मांडण्यापुर्वी तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येवुन धुपारती नंतर अंगारा काढण्यात आला यावेळी महंत,पुजारी,सेवेकरी व मंदीर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी देवीच्या मुरली वाजवतानाच्या रुपाचे दर्शन घेतले.

राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आमदार रवी राणांची मागणी..

शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगणार..

पैसे आपल्या बापाचे नाही आहे मायबाप शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचायची आहे...

मुख्यमंत्री पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे

रवी राणांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांना खडसावलं*

आमदार रवी राणा यांच्याकडून अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी..

तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट पूरग्रस्तांच्या मदतीला

तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे,ज्यांचे अती नुकसान झाले आहे त्यांना देखील वेगळी मदत मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे यंदा मराठवाड्यावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. यावेळी तेरणा ट्रस्ट आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून आलं आहे.

पाण्यात मध्यभागी अडकलेल्या 70 वर्षे इसमासह नऊ जनावरांचे थिलोरी ग्रामस्थांनी वाचवले प्राण

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.नदी नाले हे तुडुंब भरून वाहत होते. तर संपूर्ण शेतामध्ये सुद्धा नदीचे स्वरूप पाहायला मिळाले यादरम्यान दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाट्या जवळ असलेल्या रस्त्यावरील मोठ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. याच पुलाच्या नाल्याच्या मध्यभागी थीलोरी येथील शेतमजूर सहदेव बेंदाजी थोरात हे आपल्या बकऱ्या घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी शेतामध्ये गेले होते.मात्र अचानक पाऊस सुरू झाला व यात ते आपल्या बकऱ्या सह नाल्याच्या मध्यभागी अडकले.सहदेवराव थोरात हे घरी परत न आल्याने गावातील काही लोकांनी शेताकडे जाऊन पाहिले असता सहदेवराव थोरात हे नाल्याच्या मध्ये भागी अडकल्याचे लक्षात आले गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Dharashiv: धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे कांद्याचा झाला चिखल,कांदा पिकात पाणीच पाणी

धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे मोठ नुकसान झालय,सोयाबीन पिक पुर्णपणे उद्ध्वस्त झालय तर कांदा देखील आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सडुन जात आहे.कांद्याच्या शेताला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल आहे शेतकऱ्यांने केलेला खर्च वाया गेला असुन त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

काढणीवर आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अजूनही कायम

डोंगरी व तितुर नदीला मोठा पूर, नदीकाठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळे हलवले.

हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसराला पाण्याचा वेढा

शहरातील अनेक सखल भागात साचले पाणी

रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित

अग्निशमन दलाने रात्रभर पुराचा सायरन वाजवत नागरिकांना सतर्क केले.

Thane News: ठाणेकरांना आज पहाटे पासून झोडपून काढले

ठाणेकरांना आज पहाटे पासून झोडपून काढलेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असतानाच घोडबंदर रोड वर मेट्रो चे काम सुरू आहे. त्या मुळे त्याठिकाणी असलेले मानपाडा, कासारवडवली या ठिकाणी पाणी साचले आहे. अज दिवसभर पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com