
नंदुरबार शहरातील अनेक सकल भागांमध्ये पावसाचं पाणी साचले आहे. नळवा रोड परिसरात असलेल्या रेल्वे बोगद्यात त दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. रेल्वे बोगद्यात साचलेल्या गुडघ्यावर पाण्यातून मोटारसायकलस्वारांची कसरत होते. रेल्वे बोगद्यात पाणी गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय.
कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नयेत अशा सूचना बंदर विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून शनिवारी सकाळपासून रायगडमध्ये कमी अधिक जोराच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून रायगडला रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला होता त्या नुसार आज संध्याकाळ पासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग असलेल्या रेंडाळे, राजापूर,ममदापुर यासह काही भागात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगाट व वादळी झालेल्या जोरदार पावसाने कांदा, मका शेतात पाणी साचले आहे,या जोरदार पावसाने पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय
काल रात्रीनंतर आज भंडारा जिल्ह्यात सर्वत्र दिवसभर कुठं हलक्या तर, कुठं जोरदार पावसानं हजेरी लावली. परिणामी, वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात आली आहे. सकाळी धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू करण्यात आले होते. आता त्यात आणखी सहा दरवाजे वाढविण्यात आले असून धरणाचे 15 दरवाजे आता अर्धा मीटरनं सुरू असून त्यातून 66 हजार 568 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर, भंडारा ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीला जोडणाऱ्या मार्गावरील सावरला ते विलंब या मार्गावरील पुलावर पावसाचं पाणी असल्यानं वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आलाय. तर भंडारा ते कारधा असे दोन मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
उद्या सरकारकडून लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडणार...
राज्यभरातील अभ्यासकांची उद्या दुपारी बारा वाजता मीटिंग बोलवणार.
नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस....
अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची उडाली धावपळ....
मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरात नदीचे स्वरूप....
पाणीचा निचरा होत नसल्याने मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी....
नंदुरबारच्या मुख्य रस्त्यांवर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणीच पाणी....
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना परिसरात मुसळधार पावसाने शेतकऱ्यात पाणी साचले आहे. या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, मुंग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: कापणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी करताना हेक्टरी ५० हजार रुपये मदत व सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे. पावसामुळे संपूर्ण सोयाबीन खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
माढा तालुक्यातील पूर बाधित शेतकरी बारा बलुतेदार यांच्या मदतीसाठी आता राज्यातील देवस्थानने पुढे येऊन त्यांना जमेल त्या रूपात मदत करावी असे आमदार अभिजीत पाटील यांनी साकडे घातले आहे .
माढा तालुक्यातील 16 गावांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. अनेक जण शेल्टर कॅम्प मध्ये आश्रयाला आहे. घरात चिखल गाळ झाला आहे. जे साहित्य राहिले होते ते सर्व पाण्यात भिजले आहे. वाहून गेले आहे. त्यामुळे शिर्डी, लालबाग, सिद्धीविनायक, दगडूशेठ या देवस्थान ट्रस्ट यांनी आता पूर बाधितांच्या मदतीला यावे असे साकडे आमदार अभिजीत पाटील यांनी घातले आहे
मुरुडजवळ पिकअप टेम्पो आणि एसटी बस यांची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत.
नवरात्रीनिमित्त मुरूडच्या कोटेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. जखमींवर मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
डोबिंवलीमध्ये जिल्हा परिषद शाळेत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घटना समोर आली आहे. शिक्षकानेच ही र्घृणास्पद कृती केल्याचे म्हटले जात आहे. चिमुरडीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचा आरोप पालक, ग्रामस्थ यांनी केला आहे.
लातूरच्या जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावाला दोन्ही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावात साधारण 700ते 800 लोक आहेत, दरम्यान या सर्व गावकऱ्यांचं तात्काळ स्थलांतर करणे आवश्यक असल्याने स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने काही लोकांना स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे, मात्र रेस्क्यूच काम जोखमीच असल्याने, एनडीआरएफ पथकाला प्राचारण करण्यात आल्याची माहिती मिळती आहे..
जालना जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट जारी
पुढील काही तासांमध्ये विजांच्या कडकडांसह मुसळधार पावसाची शक्यता.
जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच आवाहन
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे मंदिरात दर्शनासाठी जात असताना अंगावर भीत कोसळल्याने दोन जन जखमी झाले आहे. थोडक्यात बालन बाल बचावले आहेत.
मुडेगाव येथील संदिपान अडसूळ हे गावातीलच मंदीरात दर्शनासाठी जात होते, यावेळी प्रभू कुलकर्णी यांच्या चिरेबंदी वाड्याची भिंत आडसूळ यांच्या अंगावर कोसळली त्या घटनेत ते गाडले गेले होते. त्यांना शेजारच्या नागरिकांनी बाहेर काढले. याच ठिकाणी शेषाबाई जगताप ह्या देखील जखमी झाल्या आहेत. दोघांनाही धानोरा ( बु) येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली असून आज दुपारपासून जिल्ह्यात जळगाव पाऊस सुरू झाला असून पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
धाराशिवमधील भुम तालुक्यातील जयवंत नगर गावातील वस्तीला पुराच्या पाण्याने वेढले
भुम तालुक्यातील जयवंत नगर गावातील वस्तीवरील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
वस्तीवरील घरे सोडून नागरिक गावात आणि इतर नातेवाईकांकडे स्थलांतरित
पुराची वाढती भीषणता पाहून गावातील बंधारा देखील फोडला
अनेक घरांची पडझड, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
शेतीतील माती खरडून गेली वाहून, विजेचे खांब पडल्याने विजही गायब
सांगली , कोल्हापूर प्रमाणे माढा तालुक्यातील शेतकऱ्यानं पुराची मदत मिळाली पाहिजे. तसेच कारखानदार यांनी केवळ उसाचे गाळप न करता. जनावरांना चारापाणी देण्यासाठी पुढे आले पाहिजे. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
माढा तालुक्यातील सीना नदीच्या पुराची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना अडवून संताप व्यक्त केला होता. शेतकरी संतप्त असला.तरी सरकार शेतकऱ्या सोबत असल्याचे सांगितले आहे.
एकनाथ शिंदे आज घेणार माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठका
नवी मुंबई महानगरपालिकेत निवडणूक सत्ता यावी या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची मोर्चे बांधणी
हॉटेलमध्ये माजी नगरसेवक पदाधिकारी युवा सेना यांची बैठक पार पडणार
नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा होतो आहे
मेळाव्यात अनेक दिग्गज नेते पक्षप्रवेश करणार आहेत
त्यामुळे गणेश नाईक यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची नवी मुंबई शहरात मोर्चे बांधणी होत आहे
तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींचा निधी देण्यात येणार
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे वाटप केले जाणार
महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी वाहून गेलेली जनावरे अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीचा ही संस्थांकडून नियोजन
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत करणार मदत
महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई दिली जाईल अशी आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील उंदरगाव येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आले होते.यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महापूर आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.येत्या दहा दिवसांत पंचनामे करून दिवाळी पूर्वी नुकसान भरपाई दिली जाईल.
सोलापुरात मागील काही दिवसापासून पूरपरिस्थिती आहे. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय. या पुराच्या पाण्यात अनेकांच्या घरात साप येतं असल्याचे दिसून येतं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर प्राणी आढळूबा आला. पाण्याच्या भीतीने साळींदर रस्त्यावर आला होता. त्याला वन्यजीवप्रेमीनी सुरक्षित रेस्क्यू केलं. दरम्यान शुक्रवारी सर्प दंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालंय. गावात पाण्याचा वेढा वाढल्याने नदीत असलेले साप तर वाहून येतायत मात्र विषारी साप देखील सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात लोकांच्या घरात घुसतायत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.
बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळाव्याचा आयोजन 28 सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं मात्र राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषता बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून त्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मेळाव्याच्या आयोजक सुभाष राऊत यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टामुळे आणि सुरू असलेल्या पावसामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तहसीलदार फेरफार करण्यास टाळाटाळ करत असल्याने एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयातील ही धक्कादायक घटना असून परमेश्वर मेश्राम असे 55 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन असून या जमिनीबाबत न्यायालयात प्रकरण सुरू होते. मात्र या प्रकरणाचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागून देखील गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातून त्यांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
नवी मुंबई महानगरपालिकेत निवडणूक सत्ता यावी या दृष्टीने एकनाथ शिंदे यांची मोर्चे बांधणी
हॉटेलमध्ये माजी नगरसेवक पदाधिकारी युवा सेना यांची बैठक पार पडणार
नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा होतो आहे
मेळाव्यात अनेक दिग्गज नेते पक्षप्रवेश करणार आहेत
त्यामुळे गणेश नाईक यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची नवी मुंबई शहरात मोर्चे बांधणी होत आहे
पूर्णा तालुक्यात चुडावा गावात 1 जण पुरात अडकला
गंगाखेड तालुक्यत शेक राजूर गावात 2 जण पुरात अडकले
हिंगोली मध्ये 2 गावांचा संपर्क तुटला
लातूर मध्ये 60 गावांचा संपर्क तुटला आहे, त्यात शिरूर अनंतपाळ 5, लातूर तालुक्यत 1, उदगीर तालुक्यत 12, औसा तालुक्यत 7 चाकूर मध्ये 10 , देवणी मध्ये 7 , रेणापूर मध्ये 4 , निलंगा मध्ये 9, अहमदपूर 7, उमरगा मध्ये 2..
लातूर जिल्ह्यात पुरात 4 जण अडकले आहे, चिरका अहमदपूर मध्ये 3 , मौजे हळीहंडरगुळी 1 जण अडकला
नांदेड मध्ये 28 गावांचा संपर्क तुटला..धर्माबाद मध्ये 1, अर्धापुर 1, मुखेड 3, लोहा 8 , कंधार 1, देगलूर 8, नांदेड 5 ,हदगाव 1...
बीड मध्ये माजलगाव तालुक्यतील मौजे नितरुड बड्याची वाडी मध्ये 7 नागरिक पुरात अडकले..
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.
- सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांना मुसळधार पावसाचा फटका
- सोलापूर वरून दक्षिण सोलापूरला जोडणारा होडगी रोड गेला पाण्याखाली..
- दक्षिण सोलापुरातील होडगी येथील ओढा तुडुंब भरून वाहत असल्यामुळे पाणीच पाणी..
- सोलापूर ते होडगी रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद
- होळी येथील ओढा भरून वाहत असल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक भागाचा संपर्क तुटला
- होटगी परिसरातील गावांना इतर मार्गाचा करावा लागणार वापर
- सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागाला
- मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले ओढे झाले ओव्हर फ्लो
- मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील ओढा भरून वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं पाणी
- ओढा भरून वाहिल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागत आहे वाट
- मोहोळ तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू आहे पाऊस..
रात्रीतून तब्बल 141 मंडळात अतिवृष्टी
लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपले
बीड 20, लातूर, 38, धाराशिव 18, नांदेड 25, हिंगोली 19, परभणी 21..
सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यातील अहमद पूर तालुक्यतील हडोळती येथे आणि शिरूर मंडळात 163.50 मिमी पाऊस
अक्कलकोट-बोरी ( उमरगे) मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना वाहतूक बंद करण्यात आली होती. तरीही एका ट्रक चालकाने पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्रक अचानक बंद पडल्याने वाहन पुलाच्या मधोमध पाण्यातच अडकले.
या घटनेमुळे पुलावर ट्रकचालक व वाहन काही काळ पाण्यात अडकून राहिले. स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते वाहन सुरक्षितपणे रस्त्याबाहेर काढण्यात आले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे पुसद आणि हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
सांगली शहरामध्ये परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे शहरातल्या सखल भागाची दैना उडाली असून अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून राहिलेला आहे,तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलेले आहे.शहरातल्या शिवाजी मंडई पाणी खाली गेली आहे,याठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिलेलं आहे.आज दिवसभर संततधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलाय तर
संततधार पडणाऱ्या पावसामुळे महापालिका क्षेत्रातल्या सर्व शाळांना पालिका प्रशासनाकडून सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
मन्याड नदीवर असलेल्या लिंबोटी धरणाचे 15 दरवाजे उघडले.
जवळपास दीड लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मन्याड नदीत सुरू.
कंधार तालुक्यातील कौठा गावात मन्याड नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात.
अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर.
मन्याड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
छत्रपती कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात होणार सोहळा
नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीची पालखी त्र्यंबोली मंदिरातील देवीच्या भेटीसाठी
कुमारिकेच्या हस्ते कोहळा फोडून प्रतीकात्मक राक्षसाचा वध केल्याचा विधी होणार संपन्न
फोडलेल्या कोहळ्याचा प्रसाद घेण्यासाठी दरवर्षी तरुणाईची उडते झुंबड
कोहाळ पंचमीचा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी देखील लावली हजेरी
सीना नदीला आलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्यांचे मोठं नूकसान झाले आहे तर अनेक कुटुंबांवर गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे.
माढा तालुक्यातील वाकाव येथील बाळू कदम या शेतकर्यांची शेती आणि संसार पुरात वाहून गेला आहे.
हे कुटुंब उघड्यावर आहे. त्यांच्या पर्यंत अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. मदती पासून वंचित राहिलेल्या या कुटुंबाने अखेर गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांच सहा जणांचा कुटुंब भिगवण येथे कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यासाठी निघाले.
आपल्या उरल्यासुरल्या संसारच बीराड पाठीवर घेऊन जड अंतःकरणाने आज कदम कुटुंबाने गावचा निरोप घेतला आहे.
हिंगोलीत कयाधू नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. मध्यरात्रीपासून हिंगोली मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय तर अनेक भागात ढगफुटी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहेत तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे वसमत तालुक्यातील कुरुंदा , पांगरा शिंदे यासह कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या घराचे अतोनात नुकसान झाले आहे दरम्यान कयाधू नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांचा शहराशी थेट संपर्क तुटला या संपूर्ण पूर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत , दरम्यान रेणापूर ते घनसरगाव, चाकुर ते शेळगाव, रेणापूर ते कामखेडा, उजलंब ते रोहिणा, कव्हा ते जमालपूर, जवळगा ते संक्राळ , धानोरा ते गोंद्री, शिरूर ताजबंद ते जळकोट,तिरका ते उदगीर, लातूर ते भोपळा, निलंगा ते कासार शिरसी, अहमदपूर ते थोडगा मार्गे कंधार, अहमदपूर ते शेणकुड मार्गे खंडाळी. असे मार्ग पाण्याखाली गेले आहेत.दरम्यान या मार्गावरील सगळी वाहतूक बंद करण्यात आली आहे..
जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्याला पुढील दोन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन प्रशासनाने केल आहे.दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा चिंतेत सापडलाय. जालन्यातील अंबड घनसावंगी परतुर आणि जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील गरसुळी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे तलावाच्या सांडव्या द्वारे पाणी वाहत आहे दरम्यान तलावा खालच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, गावात दवंडी देत ग्रामस्थांना सतर्क राहा अस आव्हानं करणार येत आहे. तर पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय..
- “दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा”
- आमदार चरणसिंग ठाकुर यांची राज्य सरकारकडे मागणी
- नागपूर जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी मुसळधार पाऊस, संत्रा आणि मोसंबीचं मोठं नुकसान
- गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भातील संत्रा, मोसंबीचं २०० कोटींच्या वर नुकसान
- संत्रा आणि मोसंबीची ८०-९० टक्के फळं गळाली
- शेतकऱ्यांचं हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचं नुकसान
- नागपूर जिल्ह्यात फळगळीच्या संकटामुळे शेतकरी हवालदील
- अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात साधारण सव्वा लाख हेक्टरवर संत्री आणि मोसंबीचं क्षेत्र आहे. यापैकी ८०-९० टक्के पीक गेलं
अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला बसला होता पाण्याचा वेढा
सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत रिधोरे गावच्या ग्रामस्थाना तात्काळ सुरुक्षित स्थळी हलवले
आपदा मित्रांनी बोटीच्या साहाय्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून केली रिधोरे गावाकऱ्यांची सुटका
यवतमाळ जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.यामुळे धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील अरुणावती धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे पंचवीस सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा जलद गतीने वाढत आहे. धरणाची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा वाढू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाचही दरवाजे थोड्याशा उंचीने उघडले आहेत. या माध्यमातून अरुणावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीकाठावर न जाण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
अवजड मालट्रक बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत
खंबाटकी बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू
घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा...
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वागेगव्हाण गावातून नागरिकांनी सुरू केलं सुरक्षित स्थळी स्थलांतर
काल रात्री पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
पूर परिस्थिती निर्माण होण्याआधीच प्रशासनाच्या आवाहनानुसार नागरिकांच स्थलांतर
भूम आणि परंडा तालुक्यात जिल्हा पत्ती व्यवस्थापन पथक थोड्याच वेळा दाखल होणार
अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं; तालुक्यात दोन दिवसांपासून पडत आहे पाऊस
सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या नाले वाहतायत तुडुंब
खैराट गावाजवळील ओढा झाला ओव्हरफ्लो; ग्रामीण भागातील रस्ते गेले पाण्याखाली
खैराट गावातील ओढा ओव्हर-फ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागत आहे वाट
तालुका प्रशासनाने दिला आहे सतर्कतेचा इशारा
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत बीड येथे ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी महाएल्गार मेळाव्यास ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मेळाव्याचे आयोजक ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. मात्र या पावसाचा जनजीवनावर कुठलाही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडले होते. मात्र हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाट्यासह उपनगरात जोरदार पाऊस
शहरातील उपनगरात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात
पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांची तारांबळ
पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू
अनेक गावांचा संपर्क तुटला तर अनेकांच्या दुकानात शिरले पाणी
कळंब शहरातील मुख्य बाजार पेठेला तळ्याचे स्वरूप
छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल
मागील दोन तीन दिवसापासून ताप, खोकला, सर्दी, अशक्तपणा जाणवत होता
आज जास्त त्रास जाणवू लागल्याने गॅलेक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उपचार सुरू आहेत. तब्येत थोडी खालावली आहे. काळजी नसावी.
त्यांच्यावर पुढील दोन तीन दिवस उपचार करण्यात येणार आहे.
गांजा विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिला आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक
विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने खुळेवाडी, चंदननगर परिसरात सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघी महिलांना ठोकल्या बेड्या
महिलांकडून विक्रीसाठी आणलेला 30 ते 40 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी केला जप्त
सोनाबाई अंकुश पवार ,सुवर्णा अशोक पवार ,शालन कांतीलाल जाधव अशी अटक केलेल्या तीन महिला आरोपींची नावे
तिन्ही आरोपी महिला या स्वतःच्या राहत्या घरातून करत होत्या गांजाची विक्री
भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीतील विसर्ग वाढला...
उजनीतून भीमा नदीला पाणी सोडले...
भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भीमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूरच्या वाळवंटातील मंदिरांना पाण्याचा वेढा तर जुना दगडी पूल पाण्याखाली...
चंद्रभागा नदीला पुन्हा पूर...
सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट असताना उजनी धरण क्षेत्रात मोठा पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
कोकणासाठी पुढचे तीन दिवस आँरेज अलर्ट
कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार
रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ
रत्नागिरीत आज दिवसभर पावसाची संतधार राहणार
अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी परळी तालुक्यातील पोहोनेर येथे पोहोचलेले बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. पंचनामे करण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या सोनवणे यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते राजेसाहेब देशमुख आणि त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परळी मतदारसंघातील पोहोनेर गावालाही अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला असून, शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी आज गावाला भेट दिली.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे याच पावसाचा फटका पुन्हा एकदा शेती पिकांना बसण्याची शक्यता आहे . आधीच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या पावसामुळे आता पुन्हा एकदा उरलेसुरले पिक ही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे . नदी नाले ओसंडून वाहत असताना आता शहरात रस्त्यावर पाणी साचू लागले आहेत नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे
अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओ बी सी समाजाचा मेळावा
मेळाव्याला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार
मेळाव्यात हाके यांच्या भाषणाकडं आणि भूमिकेकडे अनेकांचे लक्ष
दक्षिण सोलापूर तालुक्यात आज पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे - कासेगाव पूल पुन्हा गेला पाण्याखाली
उळे - कासेगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक झाली बंद ; कासेगावचा संपर्क तुटला
उळे - कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली निर्माण
मागील अनेक दिवसांपासून उळे - कासेगाव या पुलाची उंची वाढवावी अशी आहे ग्रामस्थांची मागणी
पहाटेपासून सातारा शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरवात...
हवामान खात्याकडून सातारा जिल्ह्याला दिला होता ऑरेंज अलर्ट...
माढा तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने सीना नदीकाठच्या गावांमधील लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
सीना नदीच्या पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. सध्या पूराचे पाणी कमी झाले असले तरी पावसामुळे पुन्हा नदीकाठच्या लोकांमध्ये पुराची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार सकाळपासून सोलापूर शहरात सुरूय पावसाची जोरदार बॅटिंग
सोलापूरसह अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाला तर पुन्हा सोलापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता झाली निर्माण
दरम्यान,सकाळपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापुकरांची झाली तारांबळ
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कडून उद्योग लावण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली, मात्र अमरावती जिल्ह्यात 200 आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 लोकांनी अद्याप उद्योग उभारले नाहीत, त्यामुळे 350 जणांना नोटीस देण्यात आली आहे, अमरावती जिल्ह्यातील एमआयडीसीत 1141 उद्योगासाठी जमीन दिली गेली होती, त्यापैकी 715 उद्योग येथे चालू आहेत, तर 226 उद्योग बंद झाले आहेत, आणि 200भूखंडावर उद्योग सुरू केले नाही, यवतमाळ जिल्ह्यात 547 उद्योग सुरू आहेत आणि 150 उद्योग बंद झाले आहेत, त्यामुळे ज्यांनी भूखंड घेतले त्यांनी जर उद्योग सुरू केले नाही तर त्यांची भूखंड परत घेतल्या जाईल असा इशारा शासनाने दिला आहे
पाच तासांपासून पुराचे पाणी ओसरत नसल्याने गावाकडे येण्यासाठी शेतकरी नदीत उतरला
प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील शेतकऱ्यांकडून धोकादायक स्थितीत प्रवास
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात अडकलेत शेतकरी पुराच्या पाण्यात
- सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- गंगापूरसह धरणात नव्यानं पाण्याची आवक वाढण्याची शक्यता
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
- गंगापूर धरणातून १६५९ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ
- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा
- दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार
- पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
हिंगोली जिल्हा प्रशासनाचे आदेश
जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद राहणार
पूर परिस्थिती ओढवल्याने प्रशासनाचा निर्णय
मध्यरात्री देखील जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्ट
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल हवामान विभागाचा अंदाज
असाच पाऊस पडत राहीला तर भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची रीपरीप सुरू असून जिल्ह्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या भात पिक चांगलेच बहरून आले आहे मात्र पावसाचा जोर वाढल्यास भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनूसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी दिली माहिती
हवामान विभागाने आज 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला जारी
धाराशिव जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या / सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलीय. पहाटे वांगणी, बदलापूर तसेच नेरळ भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे इथल्या भातशेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीय. या भागात मोठ्या प्रमाणात पावसाळी भाजीपाला पिकवला जातो.
ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वंदना टॉकीज परिसरात पाणी साचले आहे.
गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाचा इशारा
राज्यात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता
या सर्व जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे
शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी
पुणे शहरात पहाटेच्या वेळी मुसळधार पावसाने लावली हजेरी
२ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन
अतिवृष्टीमुळे बहुतांश राज्यातील पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष आणि संघटनांनीही कर्जमाफीची मागणी रेटली आहे. असे असले तरी, सरकारकडून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याचावत कसलीही हालवाल मंत्रालय पातळीवर दिसत नाही.
कर्जमाफी देण्याऐवजी नुकसानभरपाईचे निकष बदलून अधिक दिलासा देण्याचा मार्ग मध्या अवलंबिला जाण्याची शक्यता अधिक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
आज आणि उद्या मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता
२७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वारे पश्चिम दिशेने वाहू लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट मिळण्याची शक्यता
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता
लातूर जिल्हा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय, तर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
उल्हासनगर अंबरनाथ भागात जोरदार पावसाची हजेरी
सकाळी पाच वाजल्यापासून या भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे
अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
नवरात्री मंडळांची अचानक आलेल्या पावसामुळे धावफळ
मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. विजांच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. तुमसर शहरातील प्रसिद्ध बावली मंदिरात या पावसाचं पाणी शिरलं. रात्रीलाचं अनेकांनी मोटरपंप लावून शिरलेलं पावसाचं पाणी बाहेर काढल्याचही बघायला मिळालं. तर नगरपालेकेच्या विरोधात नागरिक व भाविक चांगलेच संतापले आहेत.कापणीला आलेलं भातपीक ही मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी भुईसपाट झालय. यामुळं शेतकरी आता आर्थिक विवंचनेत सापडलाय. लाखांदूर, लाखनी, मोहाडी या तालुक्यातही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय.
पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी अपडेट
घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ च्या घरावर पोलिसांचा छापा
घायवळ चे तीन वाहने पोलिसांनी केली जप्त
वाहनांमध्ये एक एस यू व्ही कार सह दोन दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त
कोथरूड पोलिसांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोठा फौजफाटा काल या कारवाई दरम्यान तैनात
कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
घायवळ सध्या लंडन मध्ये असल्याची माहिती असल्याने त्याविरोधात पुणे पोलिसांची लुक आऊट नोटीस
धाराशिव जिल्ह्यात राञी पासुन पावसाला सुरुवात
धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा,कळंब,धाराशिव,लोहारा,उमरगा सह सर्वच भागात पाऊस सुरू
भुम तालुक्यातील अंबी येथील नदीला पुर,गावातील अंबीका देवी मंदीराच्या पायऱ्या पाण्यात
कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर,सोयाबीन पिक पुर्णपणे पाण्याखाली,शेताला तळ्याचे स्वरुप
राञी पासुन जिल्हाभरात पावसाचा जोर वाढला
नवी मुंबईत पावसाला सुरुवात
दमदार पावसाची हजेरी
क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाला सकाळपासून सुरुवात
खारघर कोपरखैरणे वाशी इत्यादी ठिकाणी पाऊस सुरूC
हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे मध्यरात्री व सकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर आला आहे तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे दरम्यान हिंगोली शहरांमध्ये देखील सार्वजनिक दसरा उत्सवात पाऊस बर असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.