मराठवाड्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेला आहे. या रणरणत्या उन्हाचा फटका आता थेट जीवावर बेतू लागला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील एरंडी गावात एका 25 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे.
महेश इंगोले असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश नेहमीप्रमाणे दुपारी शेतातून काम करून घरी परतला होता. अंगणात हात पाय धुवून तो घरात गेला आणि अचानक त्याला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
लातूर जिल्ह्याचा पारा सध्या 41 ते 42 अंश सेल्सियसच्या दरम्यान आह. तर कर्नाटक सीमावर्ती भागातील औराद शहाजनी परिसरात 43.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताने झालेला हा दूसरा मृत्यू असल्याने खळबळ माजली आहे. महेशचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.