
मिताली माठकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
क्रिकेटच्या स्कोअर बोर्डवरील आकड्यांप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे..त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलं असतानाच ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीय... मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून यावर भाष्य करण्यास नकार दिलाय....
गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे..त्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आलंय.. तर मुंबई महापालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय...
- कोरोनाची लक्षणं दिसल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
- इतरांपासून अंतर बाळगा
- साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नयेत
(डॉ. संतोष कदम, इंडियन मेडिकल असोसिएशन)
सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे....मात्र राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय....मात्र कोरोनाची लाट आली तरी त्यातून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकानं खबरदारी घेण्याची गरज आहे...अन्यथा ठाण्यातील कोरोनाबळींचं लोण राज्यात पसरायला वेळ लागणार नाही...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.