Farmers KYC Deadline: उरले शेवटचे ५ दिवस! पुरग्रस्त शेतकऱ्यांनो ईकेवायसी करा, अन्यथा मिळणार नाही नुकसान भरपाई

Flood Affected Farmers KYC Deadline: पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या नुकसान भरपाईसाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख २० नोव्हेबर आहे.
Farmers KYC Deadline
Farmers KYC DeadlineSaam Tv
Published On

राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचा आहे. दरम्यान फार्मर आयडी काढण्यासाठी विभागातील तहसीलदाराचे फेस रिकग्निशन करावे लागते. मात्र, या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते.

Farmers KYC Deadline
Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

फार्मर आयडीसाठी फेस रिकग्निशनचे काम दोन मिनिटाचे आहे. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कामे सुरु झाली आहे. यामुळे तहसीलदार आणि महसूल यंत्रणा निवडणूकीच्या कामामध्ये व्यस्त आहे. यामुळे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी येत नाही. परिणामी केवायसी प्रक्रियेला उशिर होत आहे. यामुळे फेस रिकग्निशनऐवजी तहसीलदारांना ओटीपी प्रमाणिकरणाला मान्यता द्यावी, असा प्रस्ताव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूलच्या अपर मुख्य सचिवांना पाठवला आहे.

अप्पर मुख्य सचिवांकडून प्रस्ताव दिल्लीला सादर केला जाणार आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर फार्मर आयडीचा प्रश्न मार्गी लागेल. यानंतर शेतकऱ्यांचे केवायसी होणार आहे.

सोलापूरातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांसाठी ८७६ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यापैकी ३ लाख ६५ हजार ९२० शेतकऱ्यांसाठी ४४३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहेत त्यांच्या खात्यात पैसेदेखील जमा झाले आहेत. इतर शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी फार्मर आयडी असणे गरजेचे आहे.

Farmers KYC Deadline
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही e-KYC करता येणार, आदिती तटकरेंची माहिती

ई केवायसीची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत

फार्मर आयडी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी केवायसी प्रोसेस सुरु केली. मात्र, केवायसीचे सॉफ्टवेअर सावकाश काम करत असल्याने महसूत्र यंत्रणा आणि शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी ई केवायसी करावे.

Farmers KYC Deadline
Farmer News : पावसानं तोंडचा घास हिरावला, आडवी झालेली पिकं बघून शेतकरी खचला; आत्महत्येचा प्रयत्न केला, तिसऱ्या दिवशी जग सोडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com