महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात कपात करण्यात आली. त्यामुळे या 8 लाख लाडकींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणारेय. त्यातच महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफांनी लाडकीला 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन दिलयं. मात्र आश्वासनांची खैरात वाटताना मुश्रीफांनी अजब विधान केलयं.
ऐकलंत, मंत्री महोदयांनी लाडकीला आश्वासन देताना थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2100 रुपये द्यायलाच हवेत, असे म्हटलयं. मुश्रीफांच्या विधानामुळे लाडकी बहीण फक्त मतांसाठी आहे का? लाडकीच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आता लाडकीलाच गुलीगत धोका देतयं का?
लाडकीला 2100 रुपये केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतेच मिळणार का? नंतर योजना बंद होणार का? अशा अनेक प्रश्नांनी राज्यातील लाडकीच्या मनात घर केलंय...आणि मतदाराच्या भावना विष्णू सूर्या वाघ यांच्या कवितेत हे चपखलपणे मांडलं.
आमी मेंढरं मेंढरं
यावं त्यानं हकालावं
पाचा वर्साच्या बोलीनं
होते आमचा लिलाव।।
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.