Manoj Jarange Patil : अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती; मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे संतापले, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Latest News : अटक वॉरंट काढण्याचा काय गरज होती, मी काय दहशतवादी आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती; मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे संतापले, पाहा VIDEO
Devendra Fadnavis Vs Manoj Jarange Saam TV
Published On

पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं. यावरून जरांगे यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. अटक वॉरंट काढण्याचा काय गरज होती, मी काय दहशतवादी आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांसोबत बोलत होते.

अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती; मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे संतापले, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil : मध्यरात्री ४० जणांनी माझे हात पाय दाबून धरले अन् सलाईन दिली; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

सगेसोयरेची अधिसूचना काढून राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. आज बुधवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. मात्र, मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. पोटात सातत्याने कळा येऊ लागल्याने त्यांना तातडीने उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, मनोज जरांगे यांनी उपचारास नकार दिला.

त्यावेळी ४०-५० जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला जबरदस्तीने सलाईन टोचली, असं जरांगे यांनी माध्यमांना सांगितलं. दरम्यान, सलाईन लावून मी उपोषण करणार नाही. आज दुपारपर्यंत मी उपोषण मागे घेणार, अशी घोषणा जरांगे यांनी केली. त्यांनी राज्य सरकारला आणखी १ महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला. येत्या १३ ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा उपोषण सुू करणार, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

देवेंद्र फडणीस हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली. माझ्याविरोधात अटक वॉरंट का काढलं याची माहिती मला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्याच माणसाने दिली आहे. मी याबाबत आता १३ तारखेला बोलणार आहे. न्याय,पोलीस हे सगळे त्यांच्या हातात आहे. त्यामुळं आता हे सगळ सुरू आहे. फडणवीस आणि भुजबळ यांना दंगली घडवून आणायचा आहेत. मराठा समाजाला माझी एक विनंती आहे की जे मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासोबत राहू नका. त्यांचा सुपडा साफ करा तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असंही जरांगे म्हणाले.

अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती; मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे संतापले, पाहा VIDEO
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, उपोषणामुळे पोटात तीव्र कळा; मराठा बांधव चिंतेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com