अक्षय शिंदे
जालना : विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी खांबावर चढलेल्या एका जणाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या परतूर तालुक्यात घडली आहे. उच्च दाबाची विद्युत तार असल्याने सदर व्यक्ती खांबावरच चिटकला होता. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मृताला खांबावरून खाली उतरविण्याचे काम सुरु आहे.
जालन्याच्या परतुर तालुक्यातील लोणी गावात सदरची दुर्दैवी घटना घडली असून यात शिवाजी यादव (वय ५०) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार तुटणे व खांब वाकल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार परतूर ताल्यक्यातील लोणी गावात विद्युत प्रवाहात बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्ती करताना सदरची घटना घडली आहे.
उच्च दाबाची विद्युत वाहिनी
महावितरणच्या उच्चदाबाची वाहिनी असलेल्या विद्युत पोलवर बिघाड झाला असल्याने विजेचा फॉल्ट काढण्यासाठी शिवाजी यादव हे महावितरणच्या पोलवर चढले होते. यावेळी विद्युत प्रवाह सुरूच होता. यामुळे काम करताना त्यांचा स्पर्श विद्युत तारेला झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर व्यक्ती हा महावितरणचा कर्मचारी नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान पावसामुळे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेची समस्या जाणवत आहे. त्या दुरुस्तीसाठी पोलवर चढल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महावितरणला याबाबत माहिती दिल्यानंतर विजेचा प्रवाह बंद करून मृतदेह खाली उतरविण्याचे काम करण्यात येत आहे. या घटनेने लोणी गावासह परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.