
जळगाव : मुलाचे किंवा मुलीचे लग्न सोहळा म्हटला की घरात सर्व तयारी अन् आनंदाला उधाण असते. यात मुलगा एकुलता एक असला तर हा आनंद काही औरच असतो. परंतु, आपल्या डोळ्यादेखत मुलाचे (Marriage) लग्न व्हावे; अशी इच्छा प्रकट करणारी आई मुलाच्या हळदीच्याच दिवशी जगाचा निरोप घेते. ही मन हेलावून टाकणारी घटना (Amalner) अमळनेर तालुक्यातील निम येथे घडली. छातीवर दगड ठेवून नातेवाईकांनी मुलाचे लग्न लावून आईची ईच्छा पुर्ण केली. (Maharashtra News)
अमळनेर तालुक्यातील निम येथील काबाळकष्ट करणारे दाम्पत्य सरलाबाई गुर्जर व गुलाब सुपडू गुर्जर यांनी काळ्या मातील घाम गाळून मुलगा व मुलीला उच्च शिक्षित करून मुलाला अभियंता केले. मुलीचे लग्न झाले, मात्र मुलाला नोकरी लागली. परंतु, इकडे आई सरलाबाईला कॅन्सरने ग्रासले. यामुळे वर्षभरापासून (Jalgaon News) आईची प्रकृती चिंताजनक होती. यामुळे मुलाचे लग्न माझ्या डोळ्यादेखत व्हायला हवे; म्हणून पती गुलाब गुर्जर यांचाकडे इच्छा व्यक्त केली. यानुसार गुलाब गुर्जर व भाऊ राजेंद्र पाटील यांनी मुलगा बांधकाम अभियंता असलेल्या राकेशसाठी मंगरूळ (ता. चोपडा) येथील अशोक गंगाधर पाटील यांची मुलगी रोहिणी हिच्याशी विवाह निश्चीत केला. त्यानुसार ३ मेस हळद व ४ मेस विवाह सोहळा नियोजित केला.
नववर– वधूला दिला आशिर्वाद
लग्न दोन दिवसांवर असताना आई सरलाबाईला अधिक त्रास जाणवू लागला. यामुळे अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांना नातेवाईकांनी लग्नाची कल्पना देऊन ठेवली होती. हळदीचा दिवस उजाळला. ३ मेस देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्याआधी मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात अंथरुणावर असलेल्या आई सरलाबाईचे आशीर्वाद घेतले. आई सरलाबाईने नववधू– वर मुलाला जोडीत पाहून प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन बेटा नाराज राहू नको, मी लवकर उठून उभी राहील काळजी करू नको. सून रोहिणीला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणत दोन्हींच्या पाठीवरून हात फिरविला. हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जायला सांगितले.
अन् त्यांनी जगाचा निरोप घेतला
यानंतर मुलाला हळद लागत असताना व्हिडीओ कॉलने पाहून पाणी मागितले. शेवटी हळद लागली पाहून सरलाबाई डॉक्टरांनी सांगितले की आता माझी इच्छा पूर्ण झाली, मला चिंता नाही म्हणून सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्या कायमच्या निघून गेल्या. रुग्णालयात नातेवाईक व कुटुंबिय, गावातील भावबंध यांना सरलाबाईच्या निधनाची बातमी दिली. मात्र विवाह सोहळा नियोजित असल्याने सरलाबाईच्या निधनामुळे छातीवर दगड ठेवून सरलाबाईंची इच्छा पूर्ण करत हृदयात दुःख साठवून लग्न सोहळा पार पाडला. मात्र लग्न लागल्यावर राकेशने टाहो फोडत आई तुझी इच्छा पूर्ण केली. मात्र मला आताच तू कायमस्वरूपी सोडून गेली म्हणून हंबरडा फोडला. शेवटी वडील, काका व नातेवाईकांनी धीर देत सरलाबाईचा मृतदेह गावी आणून गावी अंत्यसंस्कार केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.