अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची आत्महत्या
Farmer Suicide
Farmer Suicide
Published On

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील अतिपावसामुळे शेतातील झालेल्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे कर्ज कसे फेडावे या चिंतेत असलेल्या तांबोळा खुर्द येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (jalgaon-news-chalisgaon-Crop-damage-due-to-excess-rainfall-Farmer-suicide)

चाळीसगाव तालुक्‍यात यंदा पाच वेळेस अतिवृष्‍टीचा तडाखा बसला आहे. या अतिवृष्‍टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे. परंतु, पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍याने उत्‍पन्‍न शुन्‍न झाले आहे. यामुळे कर्जाचा बोजा कसा फेडायचा हा प्रश्‍न बळीराजासमोर उभा आहे.

Farmer Suicide
काँग्रेस बाहेर; सर्वपक्षीय विषय संपुष्टात; जिल्‍हा बँक निवडणुक

शेतातच घेतले विष

तांबोळा खुर्द येथील परशुराम सुदाम पाटील (वय ४५) यांनी कर्जबाजारीपणाला व पिकांच्या अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून त्यांच्याच हिरापूर शिवारातील शेतात विष प्राशन करुन जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत महसूल विभागाचे तलाठींकडून पंचनामा करण्यात आला. मयत परशुराम पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com