
भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहेत. आता तो ठाण्यातील एका रूग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. विनोद कांबळी याची बिकट आर्थिक परिस्थिती जगासमोर आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्याकडे मोबाईल फोन नाही. मोबाईलद्वारे तो कुणाशीही संपर्क साधू शकला नाही. पण या मागचं नेमकं कारण काय?
विनोद कांबळी सध्या आर्थिक परिस्थितीला झुंज देत आहेत. त्याच्याकडे आधी आयफोन होता. आयफोन काही कारणास्तव बिघडला. नंतर त्यानं मोबाईल फोन रिपेअरसाठी दुकानात दिला. दुकानात १५००० हजारांचे मोबाईल फोनचे बिल झाले. तो आयफोनच्या दुरूस्तीसाठी १५ हजार रूपये देऊ शकला नाही. मोबाईल रिपेअरचे पैसे न भरल्यानं दुकान मालकानं कांबळी यांचा फोन जप्त केला. त्यामुळे अनेक महिन्यांपासून तो कुणाशीही संपर्क साधू शकला नाही.
विनोद कांबळी सध्या ठाण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठल्या झाल्या असून, त्याला युरीनरी इन्फेक्शनचा देखील त्रास असल्याचं आढळून आलं आहे. सध्या त्याची प्रकृती सुधारली आहे. मात्र, त्याची स्मरणशक्ती कमी झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
एक काळ होता, जेव्हा कांबळीची एकूण संपत्ती १३ कोटी रूपये होती. पंरतू सध्या त्याचा उदरनिर्वाह हा बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनमधून होत आहे. क्रिकेटपटू असल्यानं बीसीसीआय त्याला दरमहा ३० हजार रूपये देते. कांबळीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. प्रकृती काहीशी अस्थिर आणि आर्थिक समस्या असली तरीही कांबळी जिद्दीने त्याला लढा देताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.