पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच शेतामध्ये अन्नत्याग आंदोलन

मरगा तालुक्यातील मुरूम व परिसरातील काही गावांना 2019-20 च्या पीक विम्यातूनही वगळण्यात आले होते. त्याच बरोबर त्यांना 2020-21 चा देखील पीक विमा अद्याप मिळाला नसल्याने सर्व शेतकरी आक्रमक होत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Farmer Protest
Farmer Protestकैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी

ओस्मानाबाद - जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी (Farmer) अद्याप पीक विमा पासून वंचीत आहेत. त्यांना अद्याप पीक विमा रक्कम न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम येथील शेतकरी आक्रमण झाले आहेत. बसव प्रतिष्ठाणच्या माध्यमातून एकत्र येत रामलिंग पुराणे व इतर शेतकऱ्यांनी शेतामध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे .या प्रकरणी पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निवेदन देवुन अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

हे देखील पहा -

त्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल होत. यामध्ये उमरगा तालुक्यातील मुरूम व परिसरातील काही गावांना 2019-20 च्या पीक विम्यातूनही वगळण्यात आले होते. त्याच बरोबर त्यांना 2020-21 चा देखील पीक विमा अद्याप मिळाला नसल्याने सर्व शेतकरी आक्रमक होत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com